HW News Marathi
देश / विदेश

अबब ! रोटोमॅकचा ३ हजार ६९५ कोटीचा घोटाळा

सीबीआयचा तपास जसा जसा पुढे जाईल, तशी तशी घोटाळ्याची रक्कमही वाढत आहे. सुरुवातीला ८०० कोटी रुपयाचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यानंतर रोटोमॅक या पेन कंपनीचा घोटाळा आता ३ हजार ६९५ कोटींवर गेला आहे. रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारीने त्यामुळे तो आता सीबीआयच्या रडारवर आला आहे.

कर्ज घेतलेल्या बँकांमध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स विविध सात बँकांकडून कर्ज घेतले.पण, ते परत केले नाही. सीबीआयने विक्रम कोठारीच्या तीन ठिकाणांवर छापेमारी केली. सध्या विक्रम कोठारी, त्याची पत्नी आणि मुलाची कानपूरमध्ये सीबीआय चौकशी करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या ‘अजित पवारांकडून काहीतरी शिका’ 

News Desk

भाजपला मोठा धक्का, राष्ट्रवादी – समाजवादी पार्टीची युती!

News Desk

वेतन वाढीची मागणी अपुर्ण राहिल्याने आजपासून ३ दिवस बॅंकांचा संप

swarit
देश / विदेश

जाती धर्म भेद विसरून छत्रपती शिवरायांचे मावळे व्हा | रामदास आठवले

News Desk

पारतंत्र्याविरुद्ध स्वकीय भूमिपुत्रांना एकत्र करून अतुलनीय शौर्याच्या बळावर स्वराज्याची संस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा करताना त्यांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे एकतेने नांदत होते. तसेच आपसातील सर्व जातीधर्माचे भेदभाव विसरून दलित मराठ्यांसह बहुजनांनी शिवरायांचे मावळे होण्याचा संकल्प करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिकन्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आज शिवजन्मोत्सव सोहळा देशभरात मोठ्या दिमाखात साजरा होत असून दिल्लीतही मोठ्या उत्साहात साजरा झाला. नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील भव्य दिव्य पुतळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिवादन केले.याप्रसंगी पारम्पारिक वेशभूषेत वस्त्र परिधान करुन महाराष्ट्रतील मराठी समुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.विशेष करुन अभिवादन रॅलीमध्ये केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीमहाराज यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा करून आदर्श राजा’शिवरायांची शिवशाही आजही सर्व भारतीयांना हवी आहे. शिवाजी महाराजांना सारखे शूर आणि महान व्यक्तीमत्व महाराष्ट्र भूमीत जन्मले याचा आम्हाला अभिमान आहे.राष्ट्रनिर्माणाची मुहूर्तमेढ शिवाजी महाराजांनी जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वीच रोवली होती. शिवाजी महाराजां आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिले आहेत अश्या शब्दांत छत्रपती शिवरायांचा गौरव ना रामदास आठवलेंनी आपल्या भाषणात यावेळी केला

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचा ११ वा अवतार !

News Desk

बजरंग दल, विहिंप भारतातील धार्मिक दहशवादी संघटना

News Desk

… तर फटाक्यांची माळच लागेल !, मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत राज ठाकरेंचा इशारा

News Desk