HW News Marathi
देश / विदेश

बिहारमध्ये नक्षलवाद्यांचा उन्माद, भररस्त्यात ४ वाहने पेटवली

नवी दिल्ली | गडचिरोलीत बुधवारी (१ मे) नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटाची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री उशिरा बिहारमध्ये देखील नक्षलवाद्यांनी उन्माद माजवला. बिहारमधील गया जिल्ह्यातील बाराचट्टी भागात असलेली ४ वाहने जाळली आहे. नक्षलवाद्यांनी या भागात असलेले ३ जेसीबी आणि १ ट्रॅक्टर पेटवून दिले आहेत. दरम्यान, यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्‍फोटात १५ जवान शहीद झाले.

राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले. कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. या घटनेनंतर कुरखेडा तालुक्यातून पुरडा येथे जाणारा रस्ता बंद करण्यात आला असून येथे सध्या कोबिंग ऑपरेशन सुरु आहे. हे ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी हा रस्ता पुन्हा सुरु करण्यात येईल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या लोकांना न्याय मिळेल !

News Desk

संसदेत तिसऱ्यांदा तिहेरी तलाक सादर, विरोधकांचा गोंधळ

News Desk

देशात पुढची १० ते २० वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाही !

Gauri Tilekar