HW News Marathi
देश / विदेश

अमित शहाच्या स्वागतासाठी बॉईक रॅलीमुळे वाहतूक कोंडी

मुंबई | भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्ताने शुक्रवारी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाले.

मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार अमित शहाच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी विमानतळ ते बीकेसीपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली.

या बाईत रॅलीमुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी झाली होती. मुंबईकरांना जवळपास चार तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांना वाहतूक कोंडीचा त्रास झाला. अभिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विट हँडलवर ट्विट करुन वाहतूक कोंडीची माहिती दिली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०२१ वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आज, जाणून घ्या कुठे दिसणार हे ग्रहण

News Desk

आधुनिक’ जीवनशैलीमुळे घटतेय शुक्राणूंची संख्या

News Desk

‘त्या’ २२० जागांमध्ये संगमनेरदेखील असेल !

News Desk