HW News Marathi
देश / विदेश

सोहराबुद्दीन बनावट एन्काउंटर प्रकरणी आज होणार अंतिम निर्णय

मुंबई | देशातील बहुचर्चित सोहराबुद्दीन कथित बनावट एनकाउंटर प्रकरणी आज तब्बल १३ वर्षांनंतर आज (२१ डिसेंबर) सीबीआय विशेष न्यायालयात अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. २००५-०६ साली झालेल्या या एन्काउंटरमध्ये कथित गँगस्टर सोहराबुद्दीन आणि तुलसीराम प्रजापती हे दोघे जण मारले गेले होते. या एन्काउंटरनंतर देशातील राजकीय वातावरण प्रचंड तापले होते. या प्रकरणाची सुनावणी ५ डिसेंबरलाच पूर्ण झाली असून आज सीबीआय विशेष न्यायालयात न्या.एस. जे. शर्मा अंतिम निर्णय सुनावणार आहेत.

या प्रकरणात एकूण ३७ जणांना आरोपी घोषित करण्यात आले होते. ज्यापैकी १६ जणांची २०१४ मध्ये मुक्तता करण्यात आली होती. या मुक्तता झालेल्या लोकांमध्ये तत्कालीन गुजरातचे गृहमंत्री आणि विद्यमान भाजप अध्यक्ष अमित शाह, पोलीस ऑफिसर डी.जी.बंजारा यांच्यासारख्या मोठ्या नावांचा समावेश होता. सुरुवातीच्या काळात हे प्रकरण गुजरातमध्ये सुरु होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरण मुंबईत हस्तांतरित करण्यात आले.

दरम्यान, सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार सोहराबुद्दीन शेख याचा एक आतंकवादी संघटनेशी संबंध होता आणि तो एका मोठ्या षडयंत्राचा भाग होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरव मोदीची रद्द पासपोर्टवर परदेशवारी

swarit

पेट्रोल पंपावर असणारे मोदींचे फोटो हटवा – निवडणूक आयोग

News Desk

मोदींच्या प्रगती पुस्तकामुळे राहुल गांधींवर टिकेची झोड  

swarit