HW News Marathi
देश / विदेश

संसदेत उपस्थित राहण्यासाठी भाजप-काँग्रेस खासदारांना व्हीप जारी

नवी दिल्ली | संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उद्या (५ ते ८ फेब्रुवारी) पुढील सलग तीन दिवस उपस्थित राहण्यासाठी भाजपने त्यांच्या खासदारांना व्हीप जारी केला आहे. याआधी काँग्रेसने त्यांच्या लोकसभा खासदारांना आज (४ ते ८ फेब्रुवारी ) या दरम्यान उपस्थित राहण्यासाठी खासदारांना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्हीप जारी केले आहे. सध्या संसदेत सीबीआय आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील वाद आणि अर्थसंकल्पासाठी या पार्श्वभूमीवर हे व्हीप बजावण्यात आले आहेत.

पश्चिम बंगालमधील सीबीआय आणि स्थानिक पोलीस यांच्यातील वादाचे पडसाद आज (४ फेब्रुवारी) लोकसभेत देखील उमटले आहेत. या वादानंतर लोकसभेत मोठा गदारोळ माजला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन द्यायला सुरुवात केल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात “सीबीआय तोता है” अशी घोषणाबाजी केली. या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंतप्रधान खूप दिलदार, गुजरातला १००० कोटी दिले महाराष्ट्राला १५०० कोटी देतील!

News Desk

सुषमा स्वराज यांना ‘पंतप्रधान’पदाचा उमेदवार म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी दिला पाठिंबा

News Desk

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, ३ नागरिकांचा मृत्यू

News Desk
देश / विदेश

अयोध्या प्रकरणातील जमिनीसंदर्भात केंद्राच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

News Desk

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी अयोध्या मंदिराचा मुद्दा संपूर्ण देशभरात चांगलेच गाजत आहे. आठवडाभरापूर्वी केंद्र सरकारने वादग्रस्त जमीन वगळता उर्वरित जमीन मूळ मालकांना परत करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्राच्या या याचिकेला आव्हान देणारी याचिका सोमावारी (४ फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

केंद्राने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत ६७ एकरातील वादग्रस्त जमीन वगळता उर्वरित जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्यावी, अशी मागणी केली आहे. “अयोध्येत रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादग्रस्त जमिनीच्या बाजूची सुमारे ६७ एकर जमीन केंद्र सरकारकडे आहे. त्यापैकी ६७ एकरातील २.७७ एकर वादग्रस्त जमीन चहूबाजूंनी पसरलेली आहे. ज्या जमिनीवर वाद सुरू आहे. ती केवळ ०.३१३ एकर एवढीच आहे. सरकारचे म्हणणे आहे की, “ही जमीन वगळून उर्वरित जमीन परत द्यावी.”

 

Related posts

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘भारतीय सैन्य दिना’च्या शुभेच्छा

Aprna

शबरीमाला मंदिराची अनेक वर्षे जुनी परंपरा संपविण्याचा प्रयत्न | शाह

News Desk