HW News Marathi
देश / विदेश

भाजपची हिंदूत्वाची व्याख्या बदलत आहे…

नवी दिल्ली- हिंदुत्वाच्या नावाने देशभर हिंसाचार माजवून लोकांचे बळी घेणे, जातीपातीचे राजकारण करून मते मिळवणे सत्ताधाऱ्यांना डोईजड झाले आहे. त्यामुळे त्यांना आपल्या मूळ कट्टर भूमिकांमध्ये बदल करण्याशिवाय पर्याय उऱला नाही. त्याचाच भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्यावरील कार्यक्रमादरम्यान युवकांना सल्ला दिला. ते म्हणाले की कुणी काय खावे आणि काय खावू नये, हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. असेचे वक्तव्य संघप्रमुख मोहन भागवत यांनी आज केले आहे. हिंदुत्व म्हणजे कोण काय खात आहे किंवा काय परिधान करत आहे, हे ठरवणं म्हणजे हिंदुत्व नाही तर, इतरांना ते जसे आहेत तसे त्यांचा स्वीकार करणं म्हणजे हिंदुत्व, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. सध्या देशातीलराजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी केलेले विधान महत्त्वपूर्ण असे आहे.

बिफ खाणे, बाळगण्यावरून देशात अनेकांचे प्राण घेण्यात आले आहे, कोणी काय खावे किंवा काय खावू नये, हा ज्याच्यात्याचा प्रश्न आहे. परंतु याच मुद्याचे राजकारण करत ठिकठिकाणी हिंसा घडत आहेत. त्या देशासाठी मारक असल्याचे सध्या सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांनी हा मुद्दा कसा गैर आहे, हे पटवून देण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आम्हीच बाबरी मशीद पाडली, हे भाजप हिंमतीने मान्य का करत नाही ?

News Desk

भारत ‘हिंदू पाकिस्तान’ होईल | शशी थरुर

News Desk

सर्व खाद्यतेले, तेलबियांच्या साठ्याची मर्यादा ‘या’ तारखेपर्यंत वाढवली

News Desk
देश / विदेश

साडेतीनशे कोटी रुपयांचा फाइन वसूल

News Desk

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियांने ग्राहकांच्या खिशातून सुमारे साडेतीनशे कोटी रुपये वसूल केले आहेत. हे पैसे केवळ देवाण-घेवाणपोटी वसूल करण्यात आलेल्या दंडातून मिळाले, हे विशेष. तुमच्या खात्यात तीन हजारांपेक्षा कमी रक्कम असेल तर तुम्हाला दंड द्यावा लागतो. तसेच इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास पैसे आकारले जातात. मेट्रो शहरात दीडशे रुपयापर्यंत दंड आकारला जातो. तुम्ही पैसे काढा किंवा काढू नका, तुम्हाला भूर्दंड भरावाच लागणार हे नवे बँकींक धोरण असल्याचे सध्या चित्र आहे. एकीकके शासन बँक व्यवहार करण्यास प्रोत्सहन देत असून दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा धंदी सुरू आहे. एकट्या एसबीआय बँकेने ग्राहकांकडून दंडापोटी साडेतीनशे कोटी वसूल केले आहेत. इतर खासगी बँकांची ही रक्कमो कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Related posts

जाणून घ्या…देशाच्या राजकारणात अल्पावधीतच महत्त्वाचे स्थान मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल

News Desk

अरुण जेटली यांच्या निधनाने विद्वान, कर्तबगार नेता गमावला !

Gauri Tilekar

बेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे ?

News Desk