HW News Marathi
देश / विदेश

नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञा सिंह यांनी सार्वजनिक माफी मागावी | भाजप

नवी दिल्ली | “नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील,” असे वादग्रस्त विधान भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले आहे. प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा पक्षांशी काही संबंध नसून त्यांनी सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी, भाजपचे प्रवक्ता जीव्हीएल नरसिंह राव यांनी केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोपाळचे काँग्रेसचे उमदेवार दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, या निवेदनाचे मी निषेध करतो, नथुराम गोडसे एक खूनी होते, त्याचे गौरव करणारे देशभक्ती नाही, हे राजद्रोही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रज्ञा सिंह यांच्या वादग्रस्त विधानावर माफी मागावी, असे म्हणाले आहेत.

तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांनी यापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू आपण दिलेल्या शापामुळे झाला, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला होता.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, लवकरच डेबिट कार्ड करणार बंद

swarit

भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात संजय राऊत सहभागी; राहुल गांधी पहिल्यांदा जॅकेटमध्ये

Aprna

जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथील चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk