HW News Marathi
देश / विदेश

आसाममध्ये बॉम्बस्फोट, 11 लोक जखमी

नवी दिल्ली | आसाममध्ये एका एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. या ब्लास्टमध्ये काही नागरिक जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार हा बॉम्ब स्फोट आसाममधील हरसिंगा रेल्वे स्थानकात झाला आहे. हा ब्लास्ट एक्सप्रेस ट्रेनच्या एका कोचमध्ये झाला आहे. या स्फोटाची तीव्रता कमी असल्याची माहिती प्रथम दर्शनी वर्तविण्यात येत आहे.

ब्लास्ट ची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आहेत. रेल्वेचे मुख्य अधिकारी देखील घटना स्थळी हजर झाले आहेत.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. हा स्फोट कामाख्या डेकारगांव इंटरसिटी एक्स्प्रेस मध्ये झाला आहे. आता पर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 11 लोक जखमी झाले आहेत.

डीआयजी अनुराग अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार एक पोलीस पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलेले आहे. पोलीस सदर घटनेचा तपास घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘हे’ भाजपने ठाकरे सरकारविरोधात रचलेले कुटील षडयंत्र !

News Desk

Republic Day | गुणवत्तापूर्ण प्रजासत्ताकाचे महत्त्व

News Desk

कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारच्या सर्व २१ मंत्र्यांचे राजीनामे

News Desk
महाराष्ट्र

ब्राह्मण समाजानेही केली आरक्षणाची मागणी

News Desk

पुणे | मराठा आरक्षणानंतर आता इतर समाजाकडूनही आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. ब्राह्मण समाजाच्या स्थितीचे सर्वेक्षण करुन समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. त्यामुळे गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रातही ब्राह्मण आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.

ब्राह्मण समाजाला जातीच्या आधारे नव्हे तर आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण द्यावे, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे. त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. “ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ब्राह्मण समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने ब्राह्मण समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण करावे. ब्राह्मण समाज मागासलेला असल्याचे सर्वेक्षणात निष्पन्न झाल्यास शासनाने आरक्षण द्यावे,” असं आनंद दवे म्हणाले.

मराठा समाजाच्या १६ टक्के आरक्षणाच्या विधेयकाला विधीमंडळात मंजुरी मिळाली असून राज्यपालांचीही त्यावर स्वाक्षरी झाली आहे. त्यानंतर मुस्लीम आणि धनगर आरक्षणासह ब्राह्मण समाजाकडूनही आरक्षणाची मागणी होत आहे.

दुसरीकडे, गुजरातमध्येही ब्राह्मण समाजाच्या आरक्षणासाठी मागणी होत आहे. गुजरातमध्ये ब्राह्मण समाजाची लोकसंख्या ९ टक्के आहे. त्यामुळे इथल्या ब्राह्मण समाजाने इतर मागासवर्गीय आयोगाकडे धाव घेऊन ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे.

Related posts

‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही !

News Desk

नितेश राणेंनी BMC आयुक्तांना पत्र लिहून गिरगाव व्ह्यूइंग डेकची पुन्हा एकदा मागितली माहिती

Aprna

महाराष्ट्रावर नवे संकट! परभणीत ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यु

News Desk