HW News Marathi
देश / विदेश

वह्या, पुस्तकांना प्लास्टिक कव्हर नकोत | दिल्ली सरकार

नवी दिल्ली | राजधानी दिल्ली मधील शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांवरील प्लास्टिकचे कव्हर आता काढावे लागणार आहेत. वह्या पुस्तके सुरक्षित रहावित यासाठी विद्यार्थी त्यांना संरक्षण कवच म्हणून शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला प्लास्टिक कव्हर घालतात परंतु या पुढे विद्यार्थ्यांना असे कव्हर घालता येणार नाहीत.

राजधानी दिल्ली मध्ये वह्या पुस्तकांना घालण्यात आलेले प्लास्टिकचेकव्हर हटविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या आणि अशा इतर साहित्याच्या वापरावर दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातल्याने सरकारने हा आदेश दिला आहे.

दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाने सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांना आदेश दिले आहेत. आदेशात म्हटल्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या किंवा पुस्तकांवर प्लास्टिक कव्हरचा वापर करु नये अशा सुचना द्याव्यात. त्याचबरोबर हे नियम येत्या शैक्षणिक वर्षात देखील विद्यार्थ्यांना लागू असणार आहेत. आगामी शैक्षणिक सत्रासाठी तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी नवीन वर्गांची पुस्तके खरेदी केली आहेत त्यामुळे शिक्षण संचनालनालयाने तातडीने हे आदेश दिलेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संसदेत रात्री उशिरा साथरोग सुधारणा विधेयक मंजूर

News Desk

मोठ्या पडद्यावर, लवकरच येणार मीराबाई चानूच्या जीवनावर सिनेमा

News Desk

पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकाराची हत्या

News Desk
Uncategorized

राहुल गांधीं बरोबर हात मिळवणी सर्वांसमोर करेन !

News Desk

अहमदाबाद – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बरोबर हातमिळवणी करायची असेल तर ती सर्वांच्या समोर करेन असे सांगत राहुल गांधी बरोबर गुप्त बैठक झाल्याचे वृत्त पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेल याने फेटाळून लावले आहे. एका खाजगी वृत्तवाहीनीने हार्दीक आणि राहुल यांची भेट झाल्याचे वृत्त दाखवले होते. शिवाय राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये हार्दिक आल्याचे सीसीटीव्ही फुटेजही दाखवण्यात आले होते. त्यानंतर गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली होती.

हार्दीक पटेल यांना पाटीदार समाजाचा मोठा पाठींबा आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांच्या प्रत्येक हालचालांवर सरकार आणि भाजपच्या नेत्यांचे लक्ष आहे. हार्दिकचा पाठींबा मिळवण्यासाठी काँग्रेससह भाजपचे नेतेही प्रयत्नात आहेत. मात्र हार्दिक आणि त्याच्या सहकार्यांचा कल हा सध्या तरी काँग्रेसकडे असल्याचे स्पष्ट आहे. त्यातूनच राहुल आणि हार्दिकच्या भेटीचे वृत्त समोर आले आहे. शिवाय राहुल गांधी बरोबर हात मिळवणी करायची असेल तर ती सर्वां समोर करेन हे हार्दिक यांचे वक्तव्य सर्व काही सांगून जाते.

Related posts

ठाणे शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Manasi Devkar

Aprna

Aprna