HW News Marathi
Covid-19

मोठी बातमी! CBSE बोर्डाच्या १०वीच्या परीक्षा रद्द तर १२वीच्या परीक्षा लांबणीवर

नवी दिल्ली | CBSE बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १०वीच्या परीक्षा रद्द केल्या असून १२वीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. दरम्यान, १०वीच्या विद्यार्थ्यांनी दिलासा मिळाला असला तरी १२वीच्या विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेतून पुर्ण सुटका मिळाली नाही आहे. आज (१४ एप्रिल) दुपारी १२ वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरत होती.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात होणाऱ्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा मे-जून महिन्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. तारीख अद्याप सांगितली नसून लवकर तारीखही सांगण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तुर्तास परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचे युद्ध २१ दिवस नाही २०२१ पर्यंत सुरू राहणार

News Desk

तेव्हा भाजपसोबत शिवसेना नसती तर राज्य कारभार अधिक चांगला झाला असता !

News Desk

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ‘वर्षा’वर बोलावली बैठक, लॉकडाऊन की कडक निर्बंध?

News Desk