HW News Marathi
देश / विदेश

चीनला भारताच्या साखरेचा गोडवा

नवी दिल्ली । भारताकडून चीनला २० लाख टन कच्ची साखर जानेवारी महिन्यात निर्यात होणार आहे. दोन देशांदरम्यानची व्यापारी तूट भरून काढण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत भारतीय शुगर मिल्स असोसिएशन आणि चीन सरकार यांच्यामध्ये याबाबत करार करण्यात आला आहे.

वाणिज्य विभागाचे प्रतिनिधी मंडळ गेले दोन दिवस चीनमध्ये होते. त्यावेळी हा करार झाला आहे. चीनच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातले ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. साखर उद्योगाकडून या कराराचे जोरदार स्वागत केले आहे. साखरेचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारला एकूण पन्नास लाख टन साखर निर्यात करायची आहे. त्यापैकी वीस लाख टन साखर चीन खरेदी करत आहे. कच्च्या साखरेच्या निर्यातीमुळे पांढऱ्या साखरेचे उत्पादन कमी होईल बाजारात साखरेचे दर स्थिर राहतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“पश्चिम बंगालच्या निवडणूकीवर देशाच्या राजकारणाची वाटचाल अवलंबून”, राऊतांचे सूचक भाष्य

News Desk

पुढील लोकसभेसाठी विरोधकांनी एकत्र यावे!

News Desk

राम रहीमच्या खटल्यावर आज निर्णय, पंजाबमध्ये अलर्ट जारी

News Desk
देश / विदेश

आज पुन्हा पेट्रोल १५ तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त

Gauri Tilekar

नवी दिल्ली | आज (शुक्रवार) पुन्हा पेट्रोल १५ तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोलची प्रतिलिटर किंमत ८३.५७ रुपये तर डिझेलची प्रतिलिटर किंमत ७६.२२ रुपये एवढी स्वस्त झाली आहे. तर राजधानी दिल्लीत पेट्रोल १५ आणि डिझेल देखील १५ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे दिल्लीत आज पेट्रोलची प्रतिलिटर किंमत ७८.०६ तर डिझेलची प्रतिलिटर किंमत ७२.७४ रुपये एवढी झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणारी वाढ याचा परिणाम देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होत असल्याचे त्यावेळी सरकारकडून सांगण्यात आले होते. पण आता कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मध्यंतरीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने इंधनाच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा देखील केली होती. मात्र प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच असल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांमध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली होती.

Related posts

एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर सायबर हल्ला, ४५ लाख प्रवाशांची क्रेडिट कार्डसह महत्त्वाची माहिती ‘लीक’

News Desk

राष्ट्रपती रामनाथ कोविंदही करणार कोरोनाची चाचणी

swarit

देशाच्या अर्थसंकल्पाबाबत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या…

Aprna