HW News Marathi
देश / विदेश

चीन – भारतातील वाद निवळणार? बैठकीत काय तोडगा निघणार?

नवी दिल्ली | पूर्व लडाखमधील सीमावादावर तोडगा काढण्यासाठी आज (६ जून) भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर बैठक होणार आहे. गेल्या महिन्याभरापासून या भागामध्ये तणाव असून दोन्ही देशांचे सैनिक परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. एकाच बैठकीतून लगेच कोणताही तोडगा किंवा मार्ग निघणार नाही याची दोन्ही देशांना कल्पना आहे. पण सकारात्मक चर्चा सुरु झाल्यास तणाव निवळण्यास मदत होईल. सध्या दोन्ही देशांनी लडाखमध्ये मोठया प्रमाणावर सैन्य तैनात केले असून युद्धसाहित्य सुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहे.
चीनच्या ताब्यातील मोल्डो हट येथे ही बैठक होणार आहे. १४ कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. चीनकडून मेजर जनरल लिऊ लिन या बैठकीत सहभागी होतील. हरिंदर सिंग यांच्या तुलनेत लिऊ लिन कनिष्ठ रँकिंगचे अधिकारी आहेत. पण लडाखमधील नियंत्रण रेषेची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पँगॉग टीएसओ तलावाच्या क्षेत्रामध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या वादानंतर जवळपास महिन्याभराने ही बैठक होत आहे. भारत आणि चीनची नियंत्रण रेषा या तलावाजवळून जाते. या ठिकाणी सीमा हद्दीवरुन दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, कोणाशीही युती करणार नाही!

News Desk

अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाने केली रद्द!

News Desk

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk