HW News Marathi
देश / विदेश

चीनचा भारतीय सैन्यावरील हल्ला पूर्वनियोजित, सरकार झोपा काढत होते काय ?

मुंबई | भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या २० जवान शहदी झाले. या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दुसऱ्यांदा प्रश्न विचारत घेरले आहे. “भारताच्या गलवान खोऱ्याच्या चीनने भारती सैन्यावर केलाला हल्ला हा पूर्वनियोजित होता. मात्र, भारत सरकार यावेळी झोप काढत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते,” असे ट्वीट करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

राहुल गांधी म्हणाले, “भारताच्या गलवान खोऱ्याच्या चीनने भारती सैन्यावर केलाला हल्ला हा पूर्वनियोजित होता. मात्र, भारत सरकार यावेळी झोप काढत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते. भारत सरकारच्या सरकारच्या हलगर्जीपणमुळे आपल्या जवान शहदी झाले. ” तसेच राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटसोबतच एएनआयचे एक वृत्तही ट्विट केले आहे. यात, संरक्षण राज्य मंत्री श्रीपद नाईक यांचे वक्तव्य आहे. चीनने केलेला हा हल्ला आधीपासूनच नोयोजित होता, असे श्रीपद नाइक यांनी एएनआयशी बोलताना मान्य केले आहे. तसेच भारतीय लष्कर चीनला चोख उत्तर देईल, असे म्हटले होते.

भारत-चीन मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१९ जून) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यात राजकीय पक्षांचे अध्यक्ष सहभागी होणार आहेत. या बैठकीत, चीनसोत सुरू असलेला वाद आणि सद्य स्थितीवर चर्चा होणार आहे. ही सर्वपक्षीय बैठख सायंकाळी पाच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पद्धतीने होणार आहे. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला मोठा धक्का! राहुल गांधींची खासदारकी रद्द; काय आहे प्रकरण?

Aprna

Panama Papers Leak Case: ऐश्वर्या राय-बच्चन यांना EDकडून समन्स

Aprna

राजू शेट्टी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज नवी दिल्लीत भेट

News Desk