HW News Marathi
देश / विदेश

अमृतसर रेल्वे अपघातासाठी नागरिकच जबाबदार, सीसीआरएसचा अहवाल

नवी दिल्ली | पंजाबमधील अमृतसर येथे जोड फाटक येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांच्या गर्दीला भरधाव आलेल्या रेल्वेने धडक दिली. या भीषण अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात नेमकी चूक कोणाची यावर अनेक उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र, याबाबत रेल्वे प्रशासनाच्या तपास समितीने (सीसीआरएस) दिलेल्या अहवालात रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली असून रेल्वे रुळावर उभ्या असणाऱ्या लोकांनाच जबाबदार ठरविण्यात आले आहे.

अमृतसर येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळावर उपस्थित असलेल्या लोकांचा निष्काळजीपणाच त्यांच्या मृत्युचे कारण ठरला आहे, असे सीसीआरएसच्या अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे यापुढे कुठल्याही रेल्वे क्रॉसिंग लाईनजवळ जत्रा, कार्यक्रम, आंदोलन किंवा कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास सर्वप्रथम स्थानिक रेल्वे प्रशासनाला त्याबाबतची माहिती देण्यात यावी म्हणजे रेल्वे अधिकाऱ्यांना त्यावेळच्या रेल्वेच्या वेळेमध्ये गरजेनुसार बदल करण्यात येईल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीआरपीएफ’च्या पथकावर दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद

News Desk

शिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे !

swarit

राकेश अस्थाना यांची चौकशी सुरूच राहणार, दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका

News Desk