HW News Marathi
देश / विदेश

आज कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवरून परतणार मायदेशी, संपूर्ण भारताचे लक्ष

नवी दिल्ली । पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची आज (१ मार्च) अखेर मुक्तता करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) पाकिस्तानच्या संसदेत केली आहे. कमांडर अभिनंदन हे वाघा बॉर्डरवरून आपल्या मायभूमीत परतणार आहेत. कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे समजताच तातडीने त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून प्रयत्न सुरू झाले. संपूर्ण देशभरातून देखील केवळ त्यांच्या सुखरूप सुटकेसाठीच प्रार्थना केली जात होती.

भारतीय वायू दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी (२७ फेब्रुवारी) आपले लढाऊ विमान भारताच्या हवाई हद्दीत आणत पुन्हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पाकिस्तानचे लढाऊ विमान परतवून लावताना भारताचे ‘मिग-२१’ हे लढाऊ विमान कोसळले. याच दरम्यान भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या हाती लागले. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून याबाबतचा व्हिडीओ देखील व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर तातडीने भारताकडून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले. आज अखेर पाकिस्तानकडून कमांडर अभिनंदन यांची सुखरूप सुटका होऊन ते भारतात परतणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना ‘भारतरत्न’ द्या !

swarit

पंतप्रधान मोदींनी मालाड दुर्घटनाग्रस्तांना जाहीर केली २ लाखांची मदत

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसच्या केरळ प्रदेशाध्यक्षपदी पी. सी. चाको यांची नियुक्ती

News Desk