HW News Marathi
देश / विदेश

कंत्राटदारांनी शिवस्मारकाच्या रचनेत स्वतःला वाटतील तसे बदल केले !

मुंबई | शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवस्मारकाच्या बांधकामातील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. मुख्यमंत्र्यांना कोणतीही कल्पना न देता कंत्राटदार आणि सल्लागारांनी स्मारकाच्या रचनेत स्वतःला हवेत तसे बदल केले आहेत असा गंभीर आरोप मेटे यांनी केला आहे. तसेच चौकशी न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि शिवस्मारक कृती समितीला कोणतीही कल्पना न देता हे बदल केल्याचा आरोप देखील मेटे यांनी केला आहे. कंत्राटदार आणि सल्लागारांनी रचनेत स्वतःला हवेत तसे बदल केल्यामुळे पुढे मोठ्या आर्थिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी या पत्रात लिहिलेले आहे. शिवस्मारकाची उंची २१० मीटरवरुन २१२ मीटर एवढी वाढविण्यात आली आहे.यासाठी स्मारकाचा खर्च ८१ कोटींनी वाढत असल्याचे दाखवण्यात आले आहे. कोणाच्या परवानगीने ते वाढविण्यात आले ? असा सवाल मेटे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंकजा मुंडे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, उधाण

News Desk

वाचा… महात्मा गांधींचे मराठी सुविचार

News Desk

इंधन दरांमध्ये घट कायम, पेट्रोल-डिझेल १७ पैशांनी स्वस्त

swarit
देश / विदेश

पंतप्रधान मोदींना यावर्षीचा सोल शांतता पुरस्कार जाहीर

Gauri Tilekar

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावर्षीचा सोल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत तसेच जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सोल शांतता पुरस्काराच्या सांस्कृतिक संस्थेने याबद्दलची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी हे या सोल शांतता पुरस्काराचे ते १४ वे मानकरी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि श्रीमंत यांच्यातील सामाजिक आणि आर्थिक दरी कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची सोल शांतता पुरस्कार संस्थेने प्रशंसा केली आहे.

Related posts

लखीमपूर हिंसाचाराचा व्हिडीओ ट्वीट करणाऱ्या वरुण गांधींबाबत भाजपाचा मोठा निर्णय

News Desk

काश्मीरमध्ये ४ दहशतवाद्यांना कंठस्नान, १ जवान शहीद

News Desk

उत्तर प्रदेशात ब्राम्हणांवर अत्याचार | मायावती

swarit