HW News Marathi
देश / विदेश

कंत्राटदारांनी शिवस्मारकाच्या रचनेत स्वतःला वाटतील तसे बदल केले !

मुंबई | शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवस्मारकाच्या बांधकामातील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. मुख्यमंत्र्यांना कोणतीही कल्पना न देता कंत्राटदार आणि सल्लागारांनी स्मारकाच्या रचनेत स्वतःला हवेत तसे बदल केले आहेत असा गंभीर आरोप मेटे यांनी केला आहे. तसेच चौकशी न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि शिवस्मारक कृती समितीला कोणतीही कल्पना न देता हे बदल केल्याचा आरोप देखील मेटे यांनी केला आहे. कंत्राटदार आणि सल्लागारांनी रचनेत स्वतःला हवेत तसे बदल केल्यामुळे पुढे मोठ्या आर्थिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी या पत्रात लिहिलेले आहे. शिवस्मारकाची उंची २१० मीटरवरुन २१२ मीटर एवढी वाढविण्यात आली आहे.यासाठी स्मारकाचा खर्च ८१ कोटींनी वाढत असल्याचे दाखवण्यात आले आहे. कोणाच्या परवानगीने ते वाढविण्यात आले ? असा सवाल मेटे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जम्मू काश्मीरमधील इंटरनेट बंदीचा सात दिवसांत आढावा घ्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

News Desk

Republic Day | या शिवमंदिरात फडकवला जातो तिरंगा

News Desk

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्या घटनापीठाची स्थापना

News Desk
देश / विदेश

पंतप्रधान मोदींना यावर्षीचा सोल शांतता पुरस्कार जाहीर

Gauri Tilekar

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावर्षीचा सोल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत तसेच जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सोल शांतता पुरस्काराच्या सांस्कृतिक संस्थेने याबद्दलची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी हे या सोल शांतता पुरस्काराचे ते १४ वे मानकरी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि श्रीमंत यांच्यातील सामाजिक आणि आर्थिक दरी कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची सोल शांतता पुरस्कार संस्थेने प्रशंसा केली आहे.

Related posts

भारतीय हवाई दलाचे MiG-29K लढाऊ विमान गोव्यात कोसळले

Aprna

काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त उर्मिला मातोंडकर सहभागी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

“…एक इंचही जमीन कोणी घेऊ शकत नाही”, अमित शाहांचा चीनला इशारा

Aprna