HW News Marathi
Covid-19

जुलै २०२१ पर्यंत २५ कोटी लोकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य – डॉ हर्षवर्धन

नवी दिल्ली | भारतच नाही तर संपूर्ण जगाला कोरोना संकटाचा विळखा बसला आहे. कोरोनावरची लस नेमकी कधी येणार याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती देशाचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. सरकारकडून जुलै २०२१ पर्यंत देशातील २५ कोटी जनतेला कोरोनाची लस दिली जाऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले “जुलै २०२१ पर्यंत २५ कोटी लोकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. सरकारडे ४०० ते ५०० कोटी डोस उपलब्ध होती. त्यातील २५ कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण होईल” हा अंदाज हर्षवर्धन यांनी वर्तवला आहे.

“लस तयार झाल्यावर योग्य आणि न्याय्य वितरण होईल, याची खात्री करण्यासाठी आमचे सरकार २४ तास प्रयत्न करत आहे. देशातील प्रत्येकाला लस कशी दिली जाईल, यावर आमचा भर आहे” असेही ते म्हणाले. “कोव्हिडसंबंधी रोग प्रतिकारशक्तीबाबत आकडेवारीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत” असेही हर्ष वर्धन यांनी सांगितले.

“उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती लसीच्या सर्व पैलूंचा अभ्यास करत आहे. लसीचे न्याय्य वितरण सुनिश्चित करण्यावरही त्यांचा भर आहे. आरोग्य मंत्रालय राज्य सरकारांच्या सहकार्याने लसीची तात्काळ गरज भासणार्‍या गटांची यादी करत आहे” अशी माहितीही हर्ष वर्धन यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य | निर्मला सीतारमण

News Desk

निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना ३ महिन्यांचे अनुदान आगाऊ मिळणार

News Desk

एकट्या मुंबईत आज तब्बल ५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk