HW News Marathi
देश / विदेश

भारतातून पाकिस्तानात वाहून जाणाऱ्या ३ नद्यांचे पाणी वळविणार, केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली | भारतामधून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या नद्यांच्या भारताच्या वाट्याच्या पाण्याचा वापर आता भारतासाठीच करण्याचा अत्यंत मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परिणामी, आता या नद्यांचा वापर पाकिस्तानला करता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून दिली आहे.

भारतातील नद्यांचे पाकिस्तानमध्ये वाहून जाणारे पाणी पूर्ववाहिनी नद्यांना जोडून जम्मू-काश्मीर तसेच पंजाबमधील लोकांना पुरविण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नितीन गडकरी यांनी ट्विट करून दिली आहे. उत्तर प्रदेशमधील बागपत येथे झालेल्या एका सभेत नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला याबाबतच इशारा दिला होता.

विश्व बँकेच्या मध्यस्थीने १९६० साली झालेल्या सिंधू जल करारानुसार चिनाब (बियास), सतलज आणि रावी या पूर्ववाहिनी नद्यांचे नियंत्रण भारताकडे, तर सिंधू, चिनाब (चंद्रभागा) आणि झेलम या पश्चिम वाहिनी नद्यांचे नियंत्रण पाकिस्तानकडे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संपूर्ण देश सैनिकांच्या मागे उभा आहे – नरेंद्र मोदी 

News Desk

उत्तर प्रदेशात१३ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून केली हत्या

swarit

तिहेरी तलाकवरून सरकार अडचणीत

News Desk