HW News Marathi
देश / विदेश

काश्मीर प्रातांतील सर्व समस्या सोडवल्या जातील !

श्रीनगर । “काश्मीर प्रातांतील सर्व समस्या सोडवल्या जातील. जगातील कोणतीही ताकद आता आपल्याला रोखू शकत नाही”, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह माध्यमांशी बोलताना म्हणाले. सिंह सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. कठुआमधील उंज आणि सांबा जिल्ह्यातील बसन्तर येथे बांधण्यात आलेल्या दोन पुलांचे काल (२० जुलै) लोकार्पणदेखील सिंह यांच्या हस्ते केले. यावेळी ते म्हणाले, की, “काश्मीरचा प्रश्न चर्चा सोडवायचे आहेत. जर कोणाला चर्चा करुन प्रश्न सोडवायचे नसतील तर आम्हाला चांगलेच माहिती आहे., हे प्रश्न कसे सोडवायचे असतात.”

माध्यमांच्या प्रतिनिधींनी राजनाथ सिंहांना दहशतवादाबाबत प्रश्न विचारले. यावर सिंह म्हणाले की, “दहशतवादाचा प्रश्न सोडवण्यासाठी इंटरनॅशनल कम्युनिटी एकत्र येत आहे. त्यामुळे आता काश्मीरसह संपूर्ण जगाला दहशतवादापासून मुक्ती मिळेल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला आहे.” फुटिरतावादी आणि काश्मीरमधील आंदोलकांना चर्चेसाठी समोर येण्याचे आवाहन केले आहे. आपण एकत्र येऊन सर्व प्रश्न सोडवू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. राजनाथसिंह यांनी काल जम्मू-काश्मीरमधल्या द्रास सेक्टरमधील कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली. तिथे शहीद जवांनाच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी ‘वीरभूमी’ला भेट दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान फिट, देश अनफिट

News Desk

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे लोकसभेत गदारोळ

News Desk

PM Care फंडांमध्ये जमा केलेले पैसे NDRF मध्ये हस्तांतरित केले जाऊ शकत नाहीत – सुप्रीम कोर्ट

News Desk