HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीत शेतकरी आंदोलन तापलं,मोबाईल इंटरनेट सेवा केली बंद 

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले असतानाच पंजाब-हरयाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर हरयाणातील काही जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

दिल्लीत २ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मंगळवारी गालबोट लागलं. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतलं आणि बघता बघता संपूर्ण दिल्ली हादरली. काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर साहिब ए निशाण ध्वज फडकावला होता. तर दुसरीकडे पोलीस आणि शेतकरी यांच्यात प्रचंड धुमश्चक्री झाली. या हिंसेमुळे दिल्लीत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान, दिल्लीत काल (२६ जानेवारी) झालेल्या हिंसाचारानंतर पंजाब व हरयाणात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली व हरयाणातील काही भागात मोबाईल सेवाही बंद करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुक्राल यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह दिल्लीतील हिंसाचारानंतर राज्यातील कायदा व सुरक्षाव्यवस्था कोणत्याही किंमतीत कोलमडता कामा नये, असे आदेश राज्याच्या पोलीस विभागाला दिले आहेत, असं ठुक्राल यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींच्या सरकारचा पहिला निर्णय शहीद जवानांच्या मुलांसाठी

News Desk

काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा, एस. जयशंकर यांचे संसदेत स्पष्टीकरण

News Desk

‘त्या’ व्हिडिओ लिकच्या धमकीमुळं तरूणीची आत्महत्या

News Desk