HW News Marathi
देश / विदेश

केरळमध्ये साथीच्या रोगांमुळे नागरिक त्रस्त

तिरुवनंतपूरम | केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता तेथे आरोग्यासंदर्भातील अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. केरळमध्ये आलेल्या पुरामुळे रोगराई प्रचंड प्रमाणात फोफावली आहे. आतापर्यंत दूषित पाण्यामुळे होणाऱ्या साथीच्या रोगांमुळे ५० जणांचा मृत्यू झाला आहे. दूषित पाण्यामुळे केरळ राज्यात लेप्टोस्पायरोसिसची साथ पसरली आहे. लेप्टोस्पायरोसिसमुळे ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे लेप्टोस्पायरोसिसग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ही अतिशय गंभीर बाब आहे.

तसेच केरळमध्ये डेंग्यूमुळे एक जण दगावला आहे. केरळ राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टपासून एकूण १५९ जणांना लेप्टोस्पायरोसिस या रोगाने ग्रासले आहे. तर आतापर्यंत पुरामुळे १०४ लोकांना डेंग्यू आणि ५० हून अधिक जणांना मलेरिया झाला आहे. केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे ३८५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १० लाखांहून जास्त लोक विस्थापित झाले आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर केरळमध्ये साथीच्या रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आधीच वर्तविली जात होती. त्यावेळी देशाच्या विविध राज्यांतून डॉक्टर्सच्या टीम केरळला रवाना केल्या गेल्या होत्या. . मुंबई-पुण्यातून देखील वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासह ८१ डॉक्टरांची टीम केरळला रवाना करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गोवा मच्छिमार खात्याकडून गुजरातीची सक्ती

News Desk

‘चांद्रयान – २’च्या यशानंतर आता इस्रो सूर्याला गवसणी घालणार

News Desk

‘शाहीन बाग खेल खत्म’, म्हणत ‘त्या’ तरुणाने आंदोलकांवर केला गोळीबार

swarit
देश / विदेश

भाजपच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची उपस्थिती

Gauri Tilekar

नवी दिल्ली | देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज भाजपच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे देखील यावेळी उपस्थित होते. गुरुग्राममधील हरचंदपूर आणि नयागावम येथे ”स्मार्ट ग्राम परियोजना” या योजनेअंतर्गत येणाऱ्या प्रकल्पाचे प्रणव मुखर्जी आणि मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते उद्धाटन झाले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या कार्यकाळात हरचंदपूर हे गाव दत्तक घेतले होते. हरचंदपूर गावास आदर्श गाव हा किताब मिळावा यासाठी मोठ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या डिजिटल युगाचा पुरेपूर लाभ या गावाला घेता यावा यासाठी ग्रामसचिवालयात वाय-फायपासून ते डिजिटल स्क्रीनपर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

याआधी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समारोप सोहळ्याला देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहिले होते. या वेळी कॉंग्रेसच्या विचारधारेत घडलेल्या प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमाला लावलेल्या उपस्थितीमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.यावेळीही प्रणव मुखर्जी भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का यावर अनेक तर्क-वितर्क लावले गेले होते.

Related posts

अयोध्येतील राम मंदिरासाठी तोगडियांचे बेमुदत उपोषण

News Desk

जम्मू- काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला

News Desk

इस्लामिक दहशतवादाविरोधाच्या लढाईत अमेरिका नेहमीच भारतासोबत | ट्रम्प

News Desk