HW News Marathi
देश / विदेश

दिवाळी बोनस न दिल्यामुळे एअर इंडियाचे कर्मचारी संपावर

मुंबई | एअर इंडियाचे तब्बल ४०० कर्मचारी बुधवारी (८ नोव्हेंबर) रात्रीपासून संपावर गेले आहेत. दिवाळीचा बोनस न दिल्याने ग्राऊंड स्टाफ व कमर्शियल विभागातील संपाचे हत्यार उपसले आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या अचानक पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवाळीत बोनस न मिळाल्यामुळे त्यांनी संप केला आहे. हे सर्व कर्मचारी एअर इंंडियाशी संलग्न असलेल्या एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस ( एआयएटीएस) मध्ये हे कर्मचारी काम करत आहेत.

एअर इंडिया त्यांच्या कर्मचाऱ्यांना किरकोळ कारणावरून निलंबन करणे, मुलभूत सुविधा नाकारणे, कामगार संघटनानांवर अन्यायकारक अटी लादणे आणि बोनस न देणे अशा विविध कारणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण तयार होत होते. या संपातून त्यांच्यामधील रागाच स्फोट झालेला दिसून येत आहे.

विमानसेवेवर आणखी कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये प्रयत्न सुरु एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपामुळे प्रवाशांना चेक इनसाठी लांब रांगा लागल्या असून अनेक विमानांचे उड्डाणदेखील उशिराने होत आहे. चेक इन, सामान विमानात ठेवणे, स्वच्छता राखणे, कार्गो इत्यादी गोष्टींची जबाबदारी ग्राऊंड स्टाफकडे असते. पण त्यांनी आक्रमक होत संप पुकारल्याने या सर्व गोष्टींचा खोळंबा झाला असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्ता त्यांनी सांगितली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अॅट्रॉसिटी कायद्या | आज दलित-आदिवासी संघटनांची ‘भारत बंद’ची हाक

News Desk

आंध्र प्रदेशच्या पहिल्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी घेतली शपथ

News Desk

झारखंडमध्येही आता सीबीआयला चौकशीसीठी निर्बंध

News Desk
राजकारण

फैजाबादनंतर आता अहमदाबादचे नामांतर ‘कर्णावती’ होणार का?

News Desk

अहमदाबाद | उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिवाळीच्या निमित्ताने फैजा बादचे नाव बदलून अयोध्या असे केले. याआधी गोयी यांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले आहे. उत्तर प्रदेशाच्या पाठोपाठ आता गुजरातमध्ये देखील नामांतराच्ये राजकारण पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद जिल्ह्याचे नाव बदलून ‘कर्णावती’ करण्याची मागणी सत्ताधारी करत असून नामांतराच्या हालचालींना जोर आला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून आम्ही अहमदाबादचे नाव बदलून ‘कर्णावती’ करण्याचा विचार सुरू होता. आम्ही कायदेशीररित्या अहमदाबादचे नाव बदलणार असून नामांतर करून आम्ही एक पायंडा रचण्याचा विचार करत असल्याचे गुजराचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगतले. तसेच अहमदाबादचे नाव बदलून कर्णावती मागचे कारण म्हणजे इ. स. १४११ साली सुलतान शाह याने कर्णावती शहराचे नाव बदलून अहमदाबाद केल्याची नोंद आहे. ११ व्या शतकापासून साबरमती नदीकाठावरील अहमदाबादमध्ये नागरीकरणास प्रारंभ झाला.

उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये जिल्ह्याच्या नामांतर पाठोपाठ आता महाराष्ट्रमध्ये देखील जिल्ह्याच्या नामांतराची मागणी होऊ लागली आहे. आता महाष्ट्रात औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव या जिल्ह्याचे नामांतर करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणारे ट्विट शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

 

 

Related posts

सांगली जिल्हयातील ग्रामीण भागातील एका लहान शेतकरी कुटुंबात डॉ. पतंगरावांचा जन्म

News Desk

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Chetan Kirdat

केजरीवाल मिरचीपूड प्रकरणानंतर तरी शेतकऱ्यांच्या मिरचीला भाव मिळू द्या!

News Desk