HW News Marathi
देश / विदेश

गायी चोरल्याच्या संशयावरून प. बंगालमध्ये दोघांची हत्या

कोलकाता : गोवंश हत्येबंदीसाठी केंद्र शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यातच स्वयंघोषित गोरक्षकांकडून दंडेलीही सुरू आहे. याचा फटका काही वेळा निरपराधांनाही बसतो. पश्चिम बंगालमध्ये घडली.गायी चोरल्याच्या संशयावरून जमावाने दोन जणांची मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी पश्चिम बंगालच्या जलपैगुडी जिल्ह्यात घडली.

एक मृत व्यक्ती आसामचा, तर, दुसरा पश्चिम बंगालमधील आहे. हफीजुल शेख (१९) आणि अन्वर हुसेन (१९) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे रात्री एका पिकअप व्हॅनमधून गावातून चालले होते. या व्हॅनमध्ये सात गायी होत्या. बहुधा रस्त्यात भरकटल्यामुळे ते या गावातून जात होते. याचवेळी गावातील काही जणांनी ही व्हॅन रोखली. त्यानंतर व्हॅनचा चालक फरार झाला. पण,व्हॅनमधील दोन जणांना या जमावाने पकडले. हे गाय चोर आहेत असा संशय घेऊन गावकºयांनी त्यांची चौकशी केली. त्यानंतर या जमावाने त्यांना प्रचंड मारहाण केली. या व्हॅनची तोडफोड करण्यात आली.

या दोघांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी व्हॅनमधील या गायी ताब्यात घेतल्या आहेत. ही घटना धूपगडी शहरापासून १५ किमी अंतरावर बडहरिया गावात घडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला – पंतप्रधान

News Desk

सीआरपीएफचे देशाच्या सीमा सुरक्षेसह अंतर्गत सुरक्षा ठेवण्यात महत्वाचं योगदान-गृहमंत्री अमित शहा

News Desk

स्वीडनबरोबर भागीदारीसाठी महाराष्ट्र कटिबद्ध! – उपमुख्यमंत्री

Aprna