HW News Marathi
देश / विदेश

मिशन गगनयानमुळे रोजगार निर्मितीत मोठी वाढ 

श्रीहरीकोटा | “२०२२ साली अंतराळात भारताचा तिरंगा फडकेल” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत देशाच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनी ‘मिशन गगनयान’ या मोहिमेची घोषणा केली. भारतीय अंतराळवीराला स्वबळावर अंतराळात घेऊन जाणे हे इस्रोचे लक्ष्य आहे. पण त्याचबरोबर ‘या मोहिमेद्वारे देशभरात १५ हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे’, अशी माहितीदेखील इस्रोचे अध्यक्ष के. शिवन म्हणाले.

इस्रोच्या या मोहिमेमुळे देशातील रोजगार निर्मितीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. इस्रोची ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहिम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे. ‘२०२२ सालापर्यंत इस्रो आपले अंतराळवीर अवकाशात पाठवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे’, असे इस्त्रोचे अध्यक्ष के.शिवन यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तुकडे-तुकडे गँग दिल्ली सरकारमध्ये | तुषार गांधी

News Desk

#NirbhayaCase : नव्याने डेथ वॉरंट जारी, दोषींना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी

swarit

कोरोना लस गायब, ऑक्सिजनही नाही, त्याबरोबर मोदीही गायब, राहुल गांधींची टीका

News Desk