HW News Marathi
देश / विदेश

चाक नादुरुस्त असल्याचे लक्षात येऊनही एक्स्प्रेस तब्बल २०० किमी चालवली

जमशेदपूर | मुंबई सीएसएमटीहून हावडाला जाणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या थर्ड एसी डब्याची चाक नादुरुस्त झाल्याचे कळून देखील रेल्वे अधिकाऱ्यांनी ही एक्स्प्रेस तब्बल २०० किमी चालविली असून या प्रकारातून रेल्वे अधिकाऱ्यांचा बेफिकीरपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

सीएसएमटीहून सुटल्यानंतर एक्स्प्रेस ज्या अपेक्षित वेळेत पोहोचायला हवी होती त्यापेक्षा तब्बल दहा तास उशिरा पोहोचली. ही ट्रेन महालीमुरुम स्टेशनवरून गेल्यानंतर काहीतरी बिघाड झाल्याची माहिती चक्रधरपूर येथील अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर थर्ड एसीच्या बी १ डब्ब्याच्या चाकामध्ये बिघाड झाल्याचे समजले, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या तपासणीनंतर डबा वेगळा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या सर्व प्रकारात जवळपास ४५ मिनिटे वाया गेली. यामुळे आलेल्या दबावामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी हावडा ट्रेनला नादुरुस्त अवस्थेतच हावड्याला पाठविले. ट्रेनमधील प्रवाशांना हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याला विरोध करत गडबड करायला सुरुवात केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#FightCorona | देशातील ऑटोमोबाइल कंपन्यांना व्हेंटीलेटर्स बनविण्याचे केंद्राचे आदेश

News Desk

संसदेचे अर्थसंकल्प अधिवेशन आजपासून सुरू

Aprna

BiharElection |  महागठबंधनला मागे टाकत भापजची मोठी उडी 

News Desk
राजकारण

फैजाबादनंतर आता अहमदाबादचेही नामकरण ?

swarit

नवी दिल्ली । फैजाबादनंतर आता अहमदाबादच्या ही नावात बदल करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी हा निर्णय घेतला आहे. “कायदेशीर प्रक्रियांसाठी जनतेचे समर्थन मिळाल्यास अहमदाबादचे नाव बदलणार”, असे गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले आहे. प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे. अहमदाबादचे नाव ‘कर्णावती’ असे ठेण्यात येणार आहे. ”कर्णावती नाव जनतेच्या पसंतीस आहे. अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यात यावे ही लोकभावना आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळेस आम्ही अहमदाबादचे नाव बदलू”, असे पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

या निर्णयानंतर काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोशी यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. “मतांच्या राजकारण करायचे असल्याने भाजपकडून शहरांची नावे बदलली जात आहेत. अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यात काहीही अर्थ नाही”,असेही दोशी म्हणालेत. हिंदूंची दिशाभूल करण्याचे काम भाजपाकडून होते आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण ‘अयोध्या’ असे केले आहे.

Related posts

#Article370Abolished Live : कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन प्रस्ताव शहांनी लोकसभेत मांडले

News Desk

मूळ शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदेंना भेटणार! – किशोरी पेडणेकर

Aprna

#RamMandir : निवडणुकीच्या काळातच राम राम करतात, नंतर आराम करतात !

News Desk