HW News Marathi
देश / विदेश

शेतकरी १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलन करणार

नवी दिल्ली | केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घ्या, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता १८ फेब्रुवारी रोजी देशव्यापी चार तासांच्या रेल रोकोची घोषणा केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असेलेलं हे शेतकरी आंदोलन अधिक आक्रमक होतांना दिसत असून हे आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा निर्णय देखील शेतकरी नेत्यांनी घेतला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या संयुक्त बैठकीत किसान मोर्च्याची बैठक देखील पार पडली. या बैठकीत शेतकरी आंदोलकांनी १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवे कृषी कायदे सरकारने मागे घेतल्या शिवाय दिल्लीच्या बॉर्डरवरून मागे हटणार नाही, अशा भूमिकेवर हजारो शेतकरी त्याच्या मागणीवर ठाम आहेत. बुधवारी संयुक्त किसान मोर्चाची बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, दुपारी १२ ते ४ असे चार तास हे शेतकऱ्यांचे देशव्यापी रेलरोको आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाचा भाग म्हणून आंदोलनकर्त्यांनी १२ फेब्रुवारीपासून राजस्थानाच्या रस्त्यांवरील सर्व टोल वसुली करु न देण्याचा निर्णय घेतला आहे. यासह पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी १४ फेब्रुवारीला देशभर मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देखील संयुक्त किसान मोर्चा या शेतकरी संघटनेच्या संस्थेकडून देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमधील चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स

News Desk

महाराष्ट्रातलं सरकार पाडायची हिंमत कोणाच्याही बापात नाहीये!

Arati More