HW News Marathi
देश / विदेश

पहले मंदिर फिर सरकार!!! अयोध्या में मंदिर महाराष्ट्र मे सरकार… !

मुंबई | गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वादवर अखेर पडदा पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच, असा निकाल सर्वोच्च न्यायालायाने आज (९ नोव्हेंबर) दिला आहे. न्यायालायाच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे. या निर्णयावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत ट्वीट करत म्हटले की, “पहले मंदिर फिर सरकार!!! अयोध्या में मंदिर महाराष्ट्र मे सरकार… जय श्रीराम!!!.” राऊतांच्या या ट्वीटने सर्वांच्या भुवया उंचाविल्या आहेत.

राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत घेत म्हणाले की, “आजचा निर्णय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा अयोध्याला भेट दिली. त्यामुळे सरकार मजबूर झाले. अयोध्याचा निर्णय आपल्या बाजूने येईल. यात सरकारचा काहीही मुद्दा नाही. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य करावा लागेल, असे संजय राऊत म्हणाले.

राज्यात सध्या सत्ता स्थपानेवरून शिवसेना-भाजमध्ये तेढ निर्माण झाला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळ संपला असून त्यांनी काल (८ नोव्हेंबर) त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यापाल भगतसिंग कोश्यारीकडे सुपूर्त केला आहे. यानंतर नवे सरकार स्थापन होईलपर्यंत देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहून मुख्यमंत्री असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ४० जणांची स्टार प्रचारक यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर… 

News Desk

“भारत जोडो यात्रेमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करा…”, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र

Aprna

आता दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ?

News Desk