HW News Marathi
देश / विदेश

आधी शौचालय मग लग्न; मुलीने ठणकावले

उत्तर प्रदेश : टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटामध्ये शौचालयासाठी होणाऱ्या पतीकडे आग्रह करणाऱ्या मुलीचा संघर्ष दाखिवण्यात आला आहे. असाच प्रकार प्रत्यक्षातच घडला आहे.

मेरठमधील एका मुलीने अशाचप्रकारचे धाडस दाखविले. सासरी शौचालय असल्याशिवाय आपण लग्न करणार नाही, अशी मागणी या मुलीने केली आणि विशेष म्हणजे तिच्या सासरकडून ही मागणी मान्य करण्यात आली. मेरठमधील फलावदा याठिकाणी ही घटना घडली असून शौचालय बांधण्याचे काम सुरूही झाले आहे.

मेरठमधील या दोघांचे लग्न आई-वडिलांच्या मान्यतेनुसार ठरले आहे. मुलगा पदवीधारक असून तो एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. तर मुलगी १२ वी पास आहे. लग्न ठरल्यानंतर मुलाने आपल्या घरातील सर्वांची मुलीशी ओळख करून दिली. एकमेकांशी बोलत असताना मुलीने सहज घरात शौचालय आहे की नाही याबाबत चौकशी केली. तेव्हा घरात शौचालय नसून सर्व स्त्रिया त्यासाठी जंगलात जात असल्याचे सांगितले. याशिवाय अनेक वर्षांपासून असेच सुरु असल्याचेही त्याने मुलीला सांगितले. त्यामुळे तिने आधी शौचालय मग लग्न असा पवित्रा घेतला आणि सासरच्या मंडळींनी तिच्या या मागणीचा आदर राखला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘गुगल प्लस’ सेवा बंद करणार, ही आहेत कारणे

Gauri Tilekar

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलेला मिळणार पोटगी

News Desk

#Amritsar : लोकांचा उद्रेक, पोलिसांवर केली दगडफेक

Gauri Tilekar
देश / विदेश

आज निवडणुका झाल्यास भाजपचा पराभव !

News Desk

बंगळुरू- प्रचंड पैसा टाकून तसेच देशातील विविध माध्यमांच्या मालकांना हाताशी धरून भाजपने कॉँग्रेसमुक्त भारतचा विडा हाती घेतला आहे. परंतु भाजपच्या या प्रयत्नांना धक्का देणारे वृत्त कर्नाटकमधून हाती येत आहे. येथे आज निवडणुका झाल्यास कॉँग्रेस विजयी होईल, असा अंदाज सी फोर या संस्थेने व्यक्त केला आहे. हा अंदाज देशासाठी नसून केवळ कर्नाटक राज्यासाठी आहे. भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. परंतु त्यांना बहुमत मिळणे कठीण जाणार असल्याचे सी फोरने म्हटले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सी फोरने एकूण 165विधानसभा मतदारसंघातील 24 हजार 676 मतदारांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सूरू केलेली अन्न भाग्य स्कीम मतदारांना प्रचंड आवडली असल्याचे सर्व्हेमध्ये प्रामुख्याने समोर आले आहे. दरम्यान, दक्षिणेत झेंडा रोवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी शहा यांनी दौरा निश्चित केला होता परंतु हा सर्वे आल्यानंतर त्यांनी तीन वेळा कर्नाटकचा दौरा रद्द केला आहे.

Related posts

गाढ झोपलेल्या तरुणाला मृत समजून हलवले रुग्णालयात

News Desk

एफएटीएफकडून पाकिस्तान ब्लॅकलिस्ट

News Desk

ऐकावे ते नवलच ‘आदर्श सून’ होण्याचा कोर्स

News Desk