HW News Marathi
देश / विदेश

जम्मू काश्मीरमध्ये हिंसा केल्यास पाच वर्षांची शिक्षा

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने अत्यंत कठोर कायदा केला आहे. आता संप वा आंदोलनाच्या काळात दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्यास आंदोलकांना थेट पाच वर्षाचा कारावास होणार असून त्यांच्याकडून मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीची भरपाईही करून घेण्यात येणार आहे. राज्यसरकारने काढलेल्या या अध्यादेशास राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी मंजुरी दिली आहे.

जम्मू अँड काश्मीर पब्लिक प्रॉपर्टी (प्रिव्हेन्शन अँड डॅमेज) दुरूस्ती विधेयक २०१७ नुसार सार्वजनिक संपत्तीशी संबंधित सर्व कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. हा अध्यादेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणा-या व्यक्ती आणि संघटनाना आवर घालण्याचं काम या कायद्याने होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

या अध्यादेशातून दोन गोष्टी साध्य होणार आहेत. एक म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी संपत्तीचे हिंसे दरम्यान होणारे नुकसान थांबवणे. सार्वजनिक आणि खाजगी संपत्तीचे नुकसान करणे दंडनीय गुन्हा असेल. तर दुसरी गोष्ट म्हणजे अशा गुन्’ांना प्रोत्साहन देणाºयांना त्याबद्दल थेट दोषी धरण्यात येणार आहे. बंद, संप, आंदोलन आणि मोर्चा दरम्यान संपत्तीचं नुकसान झाले तर या आंदोलनाची हाक देणाºयांना २ ते ५ वषार्चा कारावास होऊ शकतो. त्याशिवाय त्यांना त्या संपत्तीची नुकसान भरपाई बाजार भावानुसार द्यावी लागणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सरकारने बँकिंग प्रणाली उद्ध्वस्त केली | राहुल गांधी

News Desk

प. बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींना बसणार मोठा धक्का

News Desk

मनसुख मांडवीया यांनी केली राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम 2022 ची सुरवात

News Desk
मनोरंजन

मोदींची नक्कल केल्याने कलावंताची हकालपट्टी

News Desk

मुंबई: स्टार प्लस वाहिनीवरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोचे नवीन पर्व सुरू झाल्यापासून तो विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करण्यात प्रसिद्ध असलेल्या कॉमेडीयन श्याम रंगीलाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या मंचावर मोदींची हुबेहूब नक्कल करताना पाहायला मिळतो. मात्र, वाहिनीने रेकॉर्ड केलेला हा भाग प्रसारित करण्यास नकार देत कार्यक्रमातून त्याची हकालपट्टी केल्याचा आरोप त्याने केला आहे.

द वायर या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत श्याम रंगीलाने हे आरोप केले आहेत. त्याने म्हटले की, मोदी आणि राहुल गांधी यांची नक्कल करतानाचा हा भाग चित्रीत झाल्यानंतर जवळपास एक महिन्यांनंतर मला कार्यक्रमाच्या प्रॉडक्शन टीमकडून फोन आला. त्यांनी मला पुन्हा नव्याने चित्रीकरणासाठी बोलावले. मोदींची नक्कल करतानाचा भाग प्रसारित न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. तुम्ही राहुल गांधींची नक्कल करू शकता मात्र मोदींची नाही असे मला वाहिनीकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी स्पर्धकांना आॅडिशन द्यावी लागते. पण, नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांची हुबेहूब नक्कल करतानाचे श्याम रंगीलाचे व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला थेट कार्यक्रमात सहभागी होण्यास निमंत्रण दिले गेले.

Related posts

#APJAbdulKalam : डॉ. अब्दुल कलामांचा असा होता कार्यकाळ…

News Desk

जाणून घ्या… बालदिन १४ नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो

News Desk

अधुरा प्रवास..त्याचा आणि तिचाही….

News Desk