HW News Marathi
देश / विदेश

भारत जोडो यात्रेदरम्यान माजी मत्री नितीन राऊत यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत

मुंबई | सध्या देशभरात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची (Bharat Jodo Yatra) चर्चा आहे. या यात्रेला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना देशभरातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या यात्रेदरम्यान राज्याचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) जखमी झाले आहेत. भारत जोडो यात्रा तेलंगणात असताना राऊत महाराष्ट्रातून सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्यासोबत हैदराबादमध्ये यात्रे चालत असताना राऊतांसोबत दुर्दैवी घटना घडली. यावेळी राहुल गांधींना पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी गेली होती. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले होते.

दरम्यान, पोलिसांनी राहुल गांधींपासून लोकांना दूर करण्यासाठी तेलंगणातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांने राऊतांना ढकलले. यात राऊतांच्या डोळ्याला दुखापत झाली होती. पोलिसांनी ढकलल्यानंतर राऊत हे जमिनीवर कोसळले. त्यादरम्यान राऊतांनी डोक्याभोवती हात ठेवला होता. परंतु, राऊतांच्या डोक्याला मार लागला नाही. तर राऊतांच्या उडव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर राऊतांना हैदराबादच्या बासेरी रुग्णालयात मंगळवाळी दाखल करण्यात आले. यात राऊतांवर उपचार सुरू असून डोळ्याच्या भुवईचा भाग कापला गेल्याची प्रथमिक माहिती मिळाली आहे. तर राऊतांचा उजवा डोळा काळानिळा पडला होता.

राऊतांच्या डोळा आणि कानाच्या मधील भागात फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले. तर राऊतांची प्रकृती स्थिर असून लवकरच रुगणालयातून घरी त्यांना सोडण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिले आहे. राऊतांच्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, के.सी. वेणुगोपाल, के. राजू यांच्यासह प्रमुख नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली असून  राहुल गांधींनी राऊतांशी फोवरून त्यांच्या तब्यातीची चौकशी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब

Aprna

सर्वाधिक वेळा संसदेत अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री कोण आहेत माहित आहे का?

swarit

उत्तर प्रदेशात सपा-राष्ट्रवादी एकत्र ,या आघाडीला पाठिंबा का द्यावा?, राऊतांचा सवाल

News Desk