HW News Marathi
देश / विदेश

भाजपच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची उपस्थिती

नवी दिल्ली | देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज भाजपच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे देखील यावेळी उपस्थित होते. गुरुग्राममधील हरचंदपूर आणि नयागावम येथे ”स्मार्ट ग्राम परियोजना” या योजनेअंतर्गत येणाऱ्या प्रकल्पाचे प्रणव मुखर्जी आणि मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते उद्धाटन झाले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या कार्यकाळात हरचंदपूर हे गाव दत्तक घेतले होते. हरचंदपूर गावास आदर्श गाव हा किताब मिळावा यासाठी मोठ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या डिजिटल युगाचा पुरेपूर लाभ या गावाला घेता यावा यासाठी ग्रामसचिवालयात वाय-फायपासून ते डिजिटल स्क्रीनपर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

याआधी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समारोप सोहळ्याला देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहिले होते. या वेळी कॉंग्रेसच्या विचारधारेत घडलेल्या प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमाला लावलेल्या उपस्थितीमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.यावेळीही प्रणव मुखर्जी भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का यावर अनेक तर्क-वितर्क लावले गेले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

…तेव्हा ‘या’ भूमित छत्रपती शिवाजी महाराजच उभे ठाकतात!

News Desk

यंदाच्या स्वातंत्र दिनी या राजकीय नेत्यांनी केले ध्वजारोहण

swarit

आता ते आईसोबत स्वर्गात असतील!; वडिलांच्या निधनानंतर मुलगी मल्लिका दुआ यांची भावनिक पोस्ट

News Desk
क्राइम

गौरी लंकेश हत्येप्रकरणी बेळगावमधून आणखी एक जण ताब्यात

Gauri Tilekar

बेळगाव | जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आता अजून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. बेळगावमधील गणेशपूर येथील एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या युवकाचे नाव सागर असून त्याने गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पळून जाण्यासाठी त्याच्या गाडीचा वापर करण्यात आल्याचा एसआयटीकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. गौरी लंकेश हत्याप्रकरणाशी जर सागरचे कोणत्याही प्रकारचे संबंध आढळले तर त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

एसआयटीकडून बेळगावातून एक ओमनी कार जप्त करण्यात आली आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी हत्येनंतर याच ओमनीचा वापर करून तिथून पळ काढला असल्याचा संशय एसआयटीला आहे. तसेच ही ओमनी सागरची असल्याची शंकादेखील व्यक्त करण्यात येत आहे. १९ ऑगस्ट रोजी एसआयटीचे एक पथक बेळगावात दाखल झाले होते. सागर हा राजकारणाशी तसेच हिंदुत्त्ववादी संघटनेशी संबंधित असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे आणखी तीन संशियितांची रेखाचित्रे देखील एसआयटीकडे आहे.

याआधी डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेच्या जप्त करण्यात आलेल्या पिस्तूलातूनच गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा सीबीआयकडून केला गेला होता. तसेच विरेंद्रसिंह तावडेसोबत मिळून सचिन अंदुरेने या हत्येचा कट रचला होता, असा दावा देखील सीबीआयने जिल्हा सत्र न्यायालयात केला होता.

Related posts

फेसबुक पोस्टमुळे काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या

swarit

सैन्यात भरती झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

भाजपच्या नगरसेवकांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

Aprna