HW News Marathi
देश / विदेश

एकाच परिवारातील चार जणांनी केली आत्महत्या

जयपूर येथील एकाच परिवारातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारही जण विष पिऊन आत्महत्या केली.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार डुंगरराम आपल्या परिवारसह गेल्या 15 वर्षापासून जयपूरमध्ये राहत होता. गेल्या काही महिण्यापासून कर्जबारी झाला होता. कर्ज जास्त झाल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डुंगरराम यांची बहीन घरासमोर राहात होती. बुधवारी जेव्हा डुंगरराम याची बहिन घरी गेली तेव्हा घरचा दरवाजा बंद होता. तीने दोन तिनवेळा दरवाज वाजवत आवाज दिला मात्र आतून कोणताही प्रतीसाद येत नव्हता. त्यामुळे तिने परत घरी गेली.आणि तिच्या नव-याला माहिती दिली. नंतर काही वेळानी परत जाऊन दरावाजा वाजवला तरी काही

प्रतीसाद मिळत नव्हाता म्हणून तिला संशय आला. तिने घराचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा उङघला नाही. शेवटी बाजुच्या घराच्या छतावरून डुंगररामच्या घरात गेली. घरातील परिस्थिती पाहुन तिला धक्काच बसला. दोन लहान मुलं आणि डुंगरराम आणि त्याची पत्नी चारही जण जमिनीवर पडलेले होते. सर्वांच्या तोडातून फेस येत होता. सर्वांनी उलट्या करत होते. तीने लगेच बाजुच्या लोकांची मदत घेऊन चार ही जणांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार दरम्यान डुंगरराम याचा मृत्यू झाला असून तिन जण गंभिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली पुढील तपास पोलिस करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात पहिल्या नंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच!

News Desk

दिल्ली सीमेवर असलेला खिळ्यांचा वेढा हा भारत-चीन सीमेवर हवा होता, राऊतांचा केंद्र सरकारला टोला

News Desk

सोहराबुद्दीन बनावट एन्काउंटर प्रकरणी आज होणार अंतिम निर्णय

News Desk