HW News Marathi
देश / विदेश

मदुराईत १०० किलो सोने जप्त, देशातील सर्वात मोठी कारवाई

मदुराई | तामिळनाडुतील मदुराई येथे प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत जवळपास १०० किलोग्रॅम सोन्याची बिस्कीटे जप्त केली आहेत. त्याचबरोबर १६३ कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. कर विभागाने टाकलेल्या धाडीतून मिळालेली आजपर्यंतची सर्वात मोठ संपत्ती असल्याचे म्हटले जाते. बांधकाम व्यावसायिक कंपनीवरही धाड टाकल्याची माहिती मिळाली आहे.

कर विभागाने मुदराईतील एसपीके कंपनीच्या वेगवेगळ्या २२ ठिकाणी धाड टाकली आहे. अरुप्पुकोटाई, वेल्लोर आणि चेन्नई येथील या कंपनीच्या कार्यालयात सोमवारी धाडी टाकल्या आहेत. ही कंपनी सरकारच्या महामार्गांचे कंत्राट घेते. कर विभानाने या धाडीत जवळपास १०० किलो सोने आणि १६३ कोटी(अंदाजे) रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या आधी २०१६ नोटाबंदीच्या काळात कर विभागने ११० कोटीची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“महाराष्ट्र आणि बंगालने दाखवलंय, मोदींचा पराभव करतो येतो!”

News Desk

इंडोनेशियात आता ज्वालामुखीचा उद्रेक

Gauri Tilekar

पाकिस्तानकडून दिल्ली ते लाहोर बससेवा देखील स्थगित

News Desk
मुंबई

केडीएमसीने रस्त्यावर खड्डे पडण्याचे खापर पावसावर फोडले

News Desk

मुंबई | पाऊसाला सुरुवात झाली की, मुंबईत पुन्हा एकदा खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. या खड्ड्यांमुळे मुंबईत अनेकांचे जीव गेले असून या खड्ड्यांमुळे १५ मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागतो. रस्त्यात खड्डे पडण्यामागचे कारण केडीएमसीने शोधन काढले आहे. की, ‘सतत होणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याचे केडीएमसीने चौकात फलकाद्वारे नागरीक आणि वाहन चालकांना’ सांगितले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेने महत्त्वाच्या चौकात ५० फलक लटकवले आहेत. या फलकाच्या माध्यमातून नागरिकांना खड्ड्यांपासून स्वत:चा जीव वाचविण्याचे आवाहनही केले आहे. रस्त्यावरील खड्डेमुळे अपघाती मृत्यूचे कारण होऊ शकत नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पाटील यांच्या वक्त्वयाने सर्व सस्तरातून निषेध व्यक्त केला गेला.

पाटील यांच्या वादग्रस्त विधानाला ४८ तास देखील पूर्ण झाले नाही तर, केडीएमसीच्या रस्त्यावर खड्डे पडण्याचे खापर पावसावर फोडले आहे. या खड्ड्यांसाठी पालिकेने प्रशासन आणि कंत्राटदाराल जबाबदार न धरता पावसाला दोष दिला जात असल्याचा अजबप्रकार कल्याण-डोंबिवलीत उघडकीस आला आहे.

तसेच केडीएमसेच्या रस्त्यांची चाळ झाली असून पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण अधिक वाढले असून रस्ते अतिशय खराब झाले आहे. यामुळे वाहनचालक आणि दुचाकीस्वारांनी हळू व काळजीपुर्वक चालवावीत, असे फलक केडीएमसीने प्रमुख चौकात लावले आहे.

Related posts

मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, २० ते २५ मिनिटे लोकल ट्रेन उशिराने

News Desk

मुंबईत अनेक ठिकाणी ‘नो गो झोन’

swarit

#26/11Attack : कसाबच्या कुकर्माची दशकपुर्ती

News Desk