HW News Marathi
देश / विदेश

अकबराला महान बोलणे म्हणजे अतिशयोक्ती | योगी

लखनऊ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अकबराला महान सम्राट वैगेरे म्हणणे ही अतिशयोक्ती ठरेल महाराणा प्रताप हेच १६ व्या शतकातील महान सम्राट होते पुढे महाराणा प्रताप यांची प्रशंसा करताना म्हटले की, स्वाभिमानी महाराणा प्रताप यांनी अरवलीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक वर्षे अकबराच्या सैन्याशी लढा दिला.

चिकाटीने लढून सर्व किल्ले परत मिळवले. तुम्ही माझे सम्राटपद मान्य करा, मी कधीच मेवाडमध्ये फिरकणार नाही, असा प्रस्ताव अकबराने महाराणा प्रतापांसमोर ठेवला होता मात्र, महाराणा प्रतापांनी अकबराचे सम्राटपद कधीच मान्य केले नाही. मी तुर्कांवर कधीच विश्वास ठेवणार नाही, असे त्यांनी अकबराला ठणकावून सांगितल्याचा इतिहास आहे अस इतिहास योगींनी उपस्थितांसमोर मांडला.

महाराणा प्रताप यांनी अकबराचे सम्राटपद कधीच मान्य केले नाही. महाराणा प्रताप त्याला अपवाद ठरले. त्यांचे हे विचार आजच्या काळातही लागू पडतात. सध्या काही लोक वैयक्तिक स्वार्थापायी स्वत:चा समाज, संस्कृती आणि देशातील वातावरण गढूळ करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्वांचे नुकसान होत आहे असे योगींनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोहराबुद्दीन बनावट एन्काउंटर प्रकरणी आज होणार अंतिम निर्णय

News Desk

अॅपलच्या एरिया मॅनेजरची गोळी घालून हत्या

News Desk

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात पुढील सुनावणी १४ ऑगस्टला होणार

News Desk