HW News Marathi
देश / विदेश

अखेर हार्दिक पटेल यांचे उपोषण मागे, सरकारकडून मात्र उपेक्षा

अहमदाबाद | पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासारख्या मागण्यांसाठी गेल्या तब्बल १८ दिवसांपासून गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचे उपोषण सुरू होते. मात्र आज १९व्या दिवशी अखेर हार्दिक पटेल यांनी आपले उपोषण सोडले आहे. परंतु हार्दिक यांच्या कोणत्याही मागण्या मान्य न करून सरकारने मात्र त्यांची उपेक्षा केली आहे. हार्दिक यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी 25 ऑगस्टला या उपोषणाला सुरुवात केली होती.

उपोषणाला १२ दिवस उलटून गेल्यानंतर पाटीदार आंदोलन समितीने जर सरकारी प्रतिनिधी चर्चेसाठी आले नाहीत तर हार्दिक पाणीदेखील सोडेल असा इशारा सरकारला दिला होता. तब्बल १२ दिवस उलटून गेल्यानंतरही आश्वासन देऊनही सरकारकडून चर्चा करण्यासाठी एकही प्रतिनिधी आंदोलनाच्या ठिकाणी येत नसल्यामुळे पाटीदार आंदोलन समितीचे संयोजक मनोज पानेरा यांनी सरकारला हा इशारा दिला होता.

गुजरातमधील शेतकरी बांधवांची कुलदेवता श्री उमिया माताजी मंदिर-उंझा आणि श्री खोडल माताजी मंदिर-कागवडच्या प्रमुख लोकांनी मला उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मी जिंवत राहून आपल्या मागण्या मान्य करुन घ्याव्यात अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच मी १९व्या दिवशी माझे उपोषण मागे घेत आहे,” अशी माहिती हार्दिक यांनी ट्विट करून दिली आहे. हार्दिक पटेल यांनी आज (बुधवारी) दुपारी ३ वाजता आपले उपोषण सोडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्याच्या मदतीसाठी तातडीने निधी मंजूर करा”; राज्य सरकारची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

News Desk

Delhi Assembly Elections 2019 : आज दिल्लीकरांचे भवितव्य होणार सीलबंद

News Desk

थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी देशाला संबोधणार, मोठ्या घोषणेची शक्यता

News Desk