HW News Marathi
देश / विदेश

अखेर हार्दिक पटेल यांचे उपोषण मागे, सरकारकडून मात्र उपेक्षा

अहमदाबाद | पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासारख्या मागण्यांसाठी गेल्या तब्बल १८ दिवसांपासून गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचे उपोषण सुरू होते. मात्र आज १९व्या दिवशी अखेर हार्दिक पटेल यांनी आपले उपोषण सोडले आहे. परंतु हार्दिक यांच्या कोणत्याही मागण्या मान्य न करून सरकारने मात्र त्यांची उपेक्षा केली आहे. हार्दिक यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी 25 ऑगस्टला या उपोषणाला सुरुवात केली होती.

उपोषणाला १२ दिवस उलटून गेल्यानंतर पाटीदार आंदोलन समितीने जर सरकारी प्रतिनिधी चर्चेसाठी आले नाहीत तर हार्दिक पाणीदेखील सोडेल असा इशारा सरकारला दिला होता. तब्बल १२ दिवस उलटून गेल्यानंतरही आश्वासन देऊनही सरकारकडून चर्चा करण्यासाठी एकही प्रतिनिधी आंदोलनाच्या ठिकाणी येत नसल्यामुळे पाटीदार आंदोलन समितीचे संयोजक मनोज पानेरा यांनी सरकारला हा इशारा दिला होता.

गुजरातमधील शेतकरी बांधवांची कुलदेवता श्री उमिया माताजी मंदिर-उंझा आणि श्री खोडल माताजी मंदिर-कागवडच्या प्रमुख लोकांनी मला उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मी जिंवत राहून आपल्या मागण्या मान्य करुन घ्याव्यात अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच मी १९व्या दिवशी माझे उपोषण मागे घेत आहे,” अशी माहिती हार्दिक यांनी ट्विट करून दिली आहे. हार्दिक पटेल यांनी आज (बुधवारी) दुपारी ३ वाजता आपले उपोषण सोडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सुपरस्टार रजनीकांत यांचे राजकारणात पदार्पण, लवकरच पक्ष स्थापन करणार!

News Desk

सुशांतची हत्या झालेली नाही, AIIMSकडून शिक्कामोर्तब

News Desk

कर्नाटकमधील मंदिरात प्रसादातून विषबाधा, १३ जणांचा मृत्यू

News Desk
व्हिडीओ

रुपयाचे मूल्य आणखी घसरणार?

News Desk

मुंबई | दिवसेंदिवस रुपयाचे मुल्य घसरत असल्यामुळे जर तुम्ही चिंतेत असाल तर तुमच्यासाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. सध्या भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरीकन डॉलरची किंमत ७२ रुपयांवर जाऊन पोहचली आहे. यामुळे फार विचलीत होण्याची गरज नाहीये, कारण खुद्द महाराष्ट्र सरकार देखील भविष्यात रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण होणार असल्याचे ग्राह्य धरुन व्यवहार करताना पहायला मिळत आहे. हे आम्ही नाही तर महाराष्ट्र शासनाने मंगळवारी काढलेल्या एका जी आर मध्ये नमूद करण्यात आले आहे

महाराष्ट्र सरकारने राज्यातील अतीमहत्वाच्या विषेश व्यक्तींसाठी नविन हेलिकॉप्टर्स खरेदीचा घाट घातला आहे. हे हेलिकॉप्टर्स अमेरीकेतील सिर्कोस्की इंटरनॅशनल ऑपरेशन या कंपनीकडून खरेदी करण्यात येणार आहे. या खरेदी करता राज्यसरकारने मे महिन्यात टेंडर देखील काढले होते. या टेंडरमध्ये १ डॉलरला ७० रुपयांप्रमाणे मुल्य देऊन सुमारे १२७.११ करोड रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र सध्या महाराष्ट्र सरकारने ११ सप्टेंबर २०१८ ला जारी केलेल्या एका शुद्धीपत्रकात डॉलरचे मुल्य ८० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या या हेलिकॉप्टर्स खरेदीसाठी सरकारने १४५.२७ करोड रुपयांना मंजूरी दिल्याचे पहायला मिळत आहे.

सध्या केंद्रसरकार घसाफोडून सांगत आहे रुपयाचे मुल्य डॉलरच्या तुलनेत यापेक्षा घसरणार नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्यात भाजपचे सरकार असतानाही भविष्यात डॉलरचे मुल्य घसरेल हा विचार करुन जर व्यवहार होत असेल, राज्य सरकार केंद्र सरकारवर विश्वास ठेवत नसेल तर जनतेचे काय हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

 

Related posts

Nitin Gadkari | शपथविधीनंतर नितिन गडकरींची पहिली पत्रकार परिषद

News Desk

Raut यांच्या कारवाईनंतर पत्राचाळ मधील लोकांच्या प्रतिक्रिया

Seema Adhe

“आता मला तर ही भीती वाटते की, शिवसैनिकांची वडापावची गाडीही..”; Sanjay Raut यांचा टोला

News Desk