HW News Marathi
देश / विदेश

मोदी मंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा मंजूर

नवी दिल्ली | कृषी धोरणावरून एनडीएमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. काल (१७ सप्टेंबर) मोदी मंत्रिमंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सरकार शेतकरी विरोधी विधेयक आणत असल्याचा आरोप करत थेट राजीनामा दिला. दरम्यान, हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.

“शिरोमणी अकाली दल या विधेयकाचा तीव्र विरोध करते. देशासाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रत्येक विधेयकाचे देशातील काही लोक समर्थन करतात तर काही त्याला विरोध करतो. सरकारच्या नव्याने येणाऱ्या ३ कायद्यांचा पंजाबमधील २० लाख शेतकऱ्यांवर प्रभाव पडणार आहे.कृषी बाजारातील ३ लाख मजूर आणि २० लाख शेतीतील मजूरांवर याचा दुष्परिणाम होणार आहे”, असे बादल यांनी म्हटले आहे.

पत्रात त्यांनी काय म्हटले आहे?

– शिरोमणी अकाली दलाने वारंवार विनंती करूनही केंद्र सरकारने या विधेयकांबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेतलेले नाही.

– शेतकऱ्यांच्या हिताच्या रक्षणाची आमच्या पक्षाची परंपरा आहे.

– पक्षाचा प्रत्येक सदस्य शेतकरी आहे.

– तीन्ही विधेयके शेतकऱ्यांचे नुकसान करणारी आहेत.

– शेतकऱ्यांची बहीण, कन्या म्हणून त्यांच्या पाठिशी उभे राहिल्याचा मला अभिमान आहे. मी शेतकऱ्यांसोबत आहे.

तीन विधेयक संसदेत मंजूर

– पहिलं विधेयक – कृषी क्षेत्र खुले करणारी शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य

– दुसरे विधेयक – शेतकरी किंमत हमी आणि कृषी सेवा करार आणि

– तिसरे विधेयक – अत्यावश्यक वस्तू

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार,राष्ट्रवादीने दिलं स्पष्टीकरण

News Desk

पेट्रोल पंपावर मोदींचा तोंडाबरोबरच डोळ्यांवर पट्टी बांधलेला फोटो लावा !

News Desk

मानव तस्करी प्रकरणी गायक दलेर मेहंदीला २ वर्षाची शिक्षा

News Desk