HW News Marathi
देश / विदेश

दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस महागला

नवी दिल्ली | ऐन दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस महागला आहे. अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात २.९४ रुपयांची, तर विनाअनुदानित गॅसच्या दरात ६० रुपयांनी वाढ झाली आहे. मध्यरात्रीपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. अनुदानित घरगुती सिलिंडरचे किंमत जूनपासून आतापर्यंत सहाव्यांदा वाढली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या सिलिंडरच्या किमतीत १४.१३ रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

अनुदानित प्रति एलजीपी सिलिंडरचा भाव बुधवारी मध्यरात्रीपासून वाढून ५०२.४० रुपयांवरून ५०५.३४ रुपयांवर पोहोचला आहे. तर विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत ६० रुपयांची वाढ होऊन ती प्रति सिलिंडर ८८० रुपयांवर गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय मूल्यातील घसरण आदी घटकांमुळे स्वयंपाकाच्या गॅस दरात वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

तसेच अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना जीएसटीमुळे २.९४ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. अनुदानित ग्राहकांना सरकार वर्षाला १४.२ किलोचे १२ सिलिंडर उपलब्ध करून देते. अनुदानित गॅस सिलिंडरवर सरकारच्या वतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येते. गेल्या महिन्यात प्रतिसिलिंडर २७६.६० रुपये अनुदान जमा करण्यात येते होते. या महिन्यात हे अनुदान ४३३.६६ रुपये करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जम्मू-कश्मीर निवडणुकीदरम्यान जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक

Gauri Tilekar

द्रौपदी मुर्मी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती, आज सरन्यायाधीश देणार गोपनीयतेची शपथ

Aprna

गेल्या ७० वर्षात एकाही  ‘संन्याशाला’ भारतरत्न देण्यात आले नाही !

News Desk
महाराष्ट्र

जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुरुवात

swarit

नाशिक । अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला आज(१ नोंव्हेबर)पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजताच्या दरम्यान पाणी सोडण्यात येणार आहे.मुळा धरणाचे दोन दरवाजे तर निळवंडे धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून या दोन्ही धरणातून ६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग आतापर्यंत झाला आहे. धरणात सलग सात ते आठ दिवस पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभाचे मुख्य अभियंता किरण देशमुख यांनी दिली आहे. पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मराठवाड्याची तहान आज अखेर भागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काल (३१ ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयावर शिक्कामोर्तब केला. अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांची याचिका फेटळाली. त्यामुळे आता मराठवाड्याला ८टीएमसी पाणी मिळणार आहे.त्याचवेळी या निर्णयाला स्थानिकांचा जनतेचा विरोध लक्षात घेता पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे.

या संदर्भात जिल्हा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. पाणी सोडताना कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी विनंती ही या पत्राद्वारे करण्यात आली आहे त्यामुळे धरणाच्या प्रवाहित मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे.तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related posts

आम्ही प्रसिद्धीच्या उद्देशाने मदत केली नाही- जयंत पाटील

Arati More

कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया 

News Desk

भाजप म्हणजेच हिंदुत्व हे सर्वसामान्य नागरिकांना समजते! – चंद्रकांत पाटील

Aprna