HW News Marathi
देश / विदेश

बडगाममध्ये दोन दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश

श्रीनगर | सीमारेषेवर पाकिस्तानच्या खुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारपासून (१ नोव्हेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान भारतीय जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. बडगाममध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी बडगाम परिसराला घेराव घातला आणि शोध मोहीम सुरु केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चकमकीदरम्यान संपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चकमकीदरम्यान संपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

swarit

चाक नादुरुस्त असल्याचे लक्षात येऊनही एक्स्प्रेस तब्बल २०० किमी चालवली

swarit

आयपीएस अधिका-याचा भाऊ बनला दहशवादी

News Desk