HW News Marathi
देश / विदेश

इम्रान खान यांचे मोदींना पत्र, कश्मीर प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी

नवी दिल्ली | भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सर्वात चर्चीला जाणारा प्रश्न म्हणजे काश्मीरच्या मुद्द्याचा होय. गेल्या अनेक वर्षापासून यावर चर्चा सुरू आहे. मात्र अजुनही त्यावर कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. अशातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे. की, काश्मीरच्या या प्रश्नावर दोन्ही देशांमध्ये चर्चा होणे गरजेचे आहे. यासाठी इम्रान खान यांनी मोदींना पत्र लिहून विनंती केली आहे.

खान यांनी पत्रात म्हटले आहे. की दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये चर्चा व्हायला हवी. काश्मीरसह दोन्ही देशांना भेडसावणारे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी आपण चर्चेसाठी पुढे यायला हवे. दोन्ही देश आणि दक्षिण आशियामध्ये शांतता स्थापित करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रित येऊन चर्चा करणे गरजेचे आहे. असेही या पत्रात त्यांनी सांगितले आहे. १४ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद मधील दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला.

यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करुन त्या हल्ल्याचे सडेतोड उत्तरही दीले. तेव्हापासून दोन्ही देशातील संबंधामध्ये अधिकच कटूता आली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये बंपर विजय मिळाल्यानंतर इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन शुभेच्छाही दील्या होत्या. तर आता पत्र लिहुन त्यांनी चर्चची मागणी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…अशीच मदत किंगफिशर एअरलाईन्सला का केली नाही ?

News Desk

शिवसेना राज्यातील तरुणांना वडापाव विकायला लावते, अन् उद्योग बंगालला पाठवते!

News Desk

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk