HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये आठ जवान शहीद

श्रीनगर(वृत्तसंस्था): दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील पोलीस लाईनवर शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ८ जवान शहीद झाले आहेत. यामधील ४ जण जम्मू काश्मीर पोलीस दलातील असून ४ जण केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) आहेत. तर या चकमकीत एका दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं असून ही चकमक अजूनही सुरू असल्याचं समजतं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारत-चीन संघर्षात शहीद झालेल्या ‘त्या’ २० जवानांची नावे जाहीर

News Desk

मायावतीची नवी राजकीय खेळी, काँग्रेस अडचणीत 

swarit

द्रौपदी मुर्मी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती, आज सरन्यायाधीश देणार गोपनीयतेची शपथ

Aprna
कृषी

गुळ क्लस्टरसाठी निधी देऊ – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

News Desk

कोल्हापूर : कोल्हापूरचा गुळ जगप्रसिद्ध असून गुळ क्लस्टरच्या निर्मितीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच कोल्हापूरचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे बोलताना दिली.

मेक इन कोल्हापूर संकल्पनेंतर्गत सयाजी हॉटेल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार चंद्रदिप नरके, आमदार संध्यादेवी कुपेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.

मेक इन कोल्हापूरसाठी उद्योजकांनी सक्रीय होऊन पुढाकार घ्यावा, शासन खंबीरपणे पाठीशी राहील, अशी स्पष्ट ग्वाही देऊन मुनगंटीवार म्हणाले, मेक इन महाराष्ट्रसाठी मेक इन कोल्हापूर बनविणे आवश्यक आहे. येथील औद्योगिक क्षेत्राला तसेच पर्यटनाला गती देण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करेल. महाराष्ट्राची देशात उत्पादनामध्ये मोठी आघाडी असून महाराष्ट्रात उद्योगाचे स्वत:च क्लस्टर निर्माण केले आहे. राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात असे उद्योग विकसित करुन नव्या पिढीला रोजगार उपलब्ध करुन देण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास करण्याचा ध्यास शासनाने घेतला असून महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

पर्यटन व्यवसायात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता असल्याने राज्यात पर्यटनावर अधिक भर दिला जात आहे. कोल्हापुरच्या पर्यटन विकासासाठी शासन कटिबद्ध असून यासाठीचे प्रस्ताव प्राधान्य क्रमाने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही देऊन वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मेक इन कोल्हापूर ही संकल्पना यशस्वी करण्याच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या निश्चितपणे केल्या जातील. कोल्हापुरात जैव विविधता संशोधन केंद्राबाबतही सकारात्मक विचार केला जाईल. कोल्हापुरच्या गुळाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच गुळासाठीचे क्लस्टर निर्माण करण्यासाठी आवश्यक लागणारा‍ निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

Related posts

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत योजनेसाठी विविध घटकांनी 31 जुलै पर्यंत नोंदणी करा – कृषी विभागाचे आवाहन

News Desk

‘कोकण कपिला’ नावाने होणार कोकणातील देशी गायींची नोंदणी

News Desk

Farmers protest : शेतकऱ्यांचा दिल्लीत हल्लाबोल, आज संसद भवनाला घेराव

News Desk