HW News Marathi
देश / विदेश

शिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे !

अहमदाबाद | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली आहे. सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भागवतांनी केले. आजकाल घटस्फोटाची संख्या वाढत चालली आहे. अगदी किरकोळ कारणांवरुनही सुशिक्षित कुटुंबांमध्ये घटस्फोटांची प्रकरणे अधित आढळत आहेत. याचे कारण म्हणजे शिक्षण आणि संपन्नतेसोबत अहंकारही येतो. त्यामुळे कुटुंब विभक्त होत समाजही विभाजित होत आहे. अशी भूमिका मोहन भागवतांनी काल (१६ फेब्रुवारी) संघाच्या कार्यकर्त्यांना अहमदाबादमध्ये संबोधताना मांडली.

“हिंदू समाज सद्गुणी आणि संघटित असावा. आपुलकीची भावना ही समाजाची ओळख आहे” असेही भागवत म्हणाले. यावरच न थांबता, ‘संघातील उपक्रमांबाबत स्वयंसेवकांनी आपल्या कुटुंबीयांनाही सांगावे, अशी आमची अपेक्षा आहे’, असेही मोहन भागवत यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. ‘मी हिंदू आहे तसेच मी सर्वधर्मीय श्रद्धास्थानांचा आदर करतो, मात्र माझ्या स्वत:च्या श्रद्धास्थानांबाबत मी आग्रही आहे. मला माझ्या कुटुंबाकडून संस्कार मिळाले आहेत आणि मातृशक्ती आम्हाला ते शिकवते, असा उल्लेखही भागवतांनी यावेळी केला.

दरम्यान, या वक्तव्यावर अभिनेत्री सोनम कपूर हिने ट्विट केलं आहे. ‘कोणता समजूतदार माणूस असं म्हणतो? असे ट्विट सोनम कपूर हिने केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BiharElection : बिहारच्या जनतेनं मतपेटीतून कुणाला कौल दिला जाहीर होणार काही तासात

News Desk

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, पेट्रोल १२ पैशांनी महागले

swarit

राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार

News Desk