HW News Marathi
देश / विदेश

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी पर्यटन क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली

नवी दिल्ली | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी ११ फेब्रुवारी २०२२ रोजी नवी दिल्ली येथे पर्यटन क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने या सामंजस्य करारावर, वाणीज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योगमंत्री पियुष गोयल यांनी स्वाक्षरी केली आणि ऑस्ट्रेलिया सरकारच्या वतीने खासदार, व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक मंत्री डॅन तेहान यांनी स्वाक्षरी केली.

पर्यटन क्षेत्रातील सामंजस्य करारामुळे सहकार्य वाढेल आणि पर्यटन क्षेत्रातील द्वीपक्षीय संबंधांच्या विस्तारास प्रोत्साहन मिळेल. या सामंजस्य करारामुळे पर्यटनाशी संबंधित माहिती आणि डेटाची देवाणघेवाण, पर्यटन हितधारक, विशेषत: हॉटेल्स आणि सहल आयोजक यांच्यातील सहकार्य, पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील प्रशिक्षण आणि शिक्षण प्रदाता यांच्यातील सहकार्य आणि देवाणघेवाण, पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील गुंतवणूक, सहल आयोजक आणि घाऊक विक्रेते यांच्या भेटी, प्रसारमाध्यमे आणि मत व्यक्त करणारे, उच्च दर्जाचा, सुरक्षित, नैतिक आणि शाश्वत पर्यटन विकास, प्रमुख सांस्कृतिक, कलात्मक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये स्वारस्य, एकमेकांच्या देशातील लागू कायदे, नियम आणि सूचना यांवर प्रवासी शिक्षणाच्या संधी आणि बहुपक्षीय व्यासपीठावर वाढवलेला पर्यटन सहभाग यात मदत होईल.

ऑस्ट्रेलिया हे भारतासाठी सर्वात महत्त्वाचे पर्यटनसंधी निर्माण करणार्‍या बाजारपेठांपैकी एक आहे (२०१९ मध्ये देशात परदेशी पर्यटकांच्या आगमनात ४ थ्या क्रमांकावर आहे आणि देशातील परदेशी पर्यटकांचा एकूण पर्यटन वाटा ३.४% आहे). ऑस्ट्रेलियासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याने या महत्त्वाच्या स्रोत बाजारपेठेतून पर्यटकांचे आगमन वाढण्यास मदत होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान अतिदक्षतेचा इशारा

News Desk

जेएनयूतील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत ‘लेफ्ट अलायन्स’चा विजय

Gauri Tilekar

राज्यसभेत पेगॅसस प्रकरणावरून पुन्हा गोंधळ, मंत्र्यांच्या हातातून निवेदन खेचून फाडलं!

News Desk