HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून पाच दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून पाच दहशतवद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. भारतीय जवाना आणि दहशतवाद्यामध्ये आज (१९ ऑक्टोबर) रोजी दोन वेगवेगळ्या झालेल्या चकमकीत एकूण पाच दहशतवद्यांना ठार करण्यात आले आहे. काश्मीरमधील सकाळी बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी आणि लष्करामध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान खाल्यात आले आहे.

तर क्रलहार दहशतवाद्यांकडे एके-२०१ रायफल, चिनी बनावटीच्या पिस्तुल आणि इतर हत्यारे सापडली आहेत. जम्मू-काश्मीरच्या डीजीपींनी सांगितले की, हा दहशतवादी हल्ला नव्हता. तर पोलिसांनी केलेल्या नाकेबंदी करून तपासणी करत असताना जवानांना दोघांवर संशय आल्याने त्यांनी या दोघांकडे ओळखपत्र मागितले. तेव्हा त्यातील एकाने पोलीस आणि सीआरपीएफवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सैन्याने हा प्रयत्न हाणून पाडला. त्याला त्याचक्षणी ठार केले, तर दुसरा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला कंठस्नान घातले. त्यांच्याकडे हत्यारे सापडली आहेत.

या दोन्ही दहशतवाद्यांकडून लष्कराला मोठ्या प्रमाणात शस्त्रा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. उत्तर काश्मीरमध्ये शुक्रवारी सकाळी नियंत्रण रेषेवर बोनियार येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार मारले. या दहशतवाद्यांकडून चार एके-४७ आणि चार खाद्यपदार्थांच्या बॅग जप्त करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी द्विपक्षीय चर्चेसाठी उत्साही | पंतप्रधान मोदी 

Gauri Tilekar

आता अ‍ॅमेझोनही देणार यूपीआय सुविधा

News Desk

एकाच स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदक भारताच्या पठ्ठ्यांना!

News Desk