HW News Marathi
Covid-19

रेल्वेकडून ३० जूनपर्यंत सर्व बुकिंग रद्द, विशेष आणि श्रमिक रेल्वे धावणार

नवी दिल्ली | भारतीयय रेल्वेने ३० जूनपर्यंतचे सर्व तिकिटांचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे. या तिकिटांचे पैसे प्रवाशांना परत करणार असल्याचे रेल्वेकडून सांगितले आहे. तर आता फक्त विशेष आणि श्रमिक रेल्वे धावणार आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या देशात तिसरे लॉकडाऊन १७ मेला संपणार आहे. त्यापूर्वीच देशात लॉकडाऊनचा चौथा घोषणा होणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१२ मे) जनतेशी संवाद साधताना दिले आहे. त्यामुळे रेल्वे ३० जूनपर्यंतचे सर्व तिकिटांचे बुकिंग रद्द केल्याच्या चर्चा आहेत.

रेल्वेने ११ मे रोजी ट्रेन्ससाठीचे ऑनलाईन बुकिंग करण्यासु सुरुवात केली होती. प्रवाशांकडून एकाच वेळी तिकीट बुकिंगसाठी प्रयत्न झाल्याने अवघ्या काहीच मिनिटांत IRCTCची वेबसाईट क्रॅश झाली होती. यानंतर ११ मे रोजी सायंकाळी रेल्वे विशेषसाठीच्या तिकीट बुकिंगला पुन्हा सुरुवात करण्यात आली. या संकेतस्थळाच्या मदतीने हजारो प्रवाशांनी इच्छित स्थळी जाण्यासाठीची तिकीटे आरक्षित केली.

स्पेशल रेल्वे सुविधेअंतर्गत जवळपास ८२, ३१७ प्रवाशांनी आरक्षित तिकीटे देण्यात आली आहेत. या प्रक्रियेदरम्यान, ४५,५३३ पीएनआरही देण्यात आले. तेव्हा १६,१५,६३,८२१ रुपये इतकी घसघशीत कमाई रेल्वेच्या खात्यात जमा झाली आहे. रेल्वेच्या या कमाईने गेल्या महिन्याभराहून ठप्प असलेल्या रेल्वेच्या कामाईने अनेकांच्या भुवया उंचावत आहे.

संबंधित बातम्या

रेल्वे मंत्रालयाने विशेष ट्रेनच्या तिकीट बुकिंगद्वारे केली ऐवढी कमाई

जाणून घ्या…मुंबई-पुण्यामधून कोणत्या राज्यासाठी धावणार रेल्वेच्या विशेष ट्रेन

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘… तर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करावा लागेल’

News Desk

चिंताजनक ! देशात एका दिवसात ९९९६ कोरोनाच्या नवीन रुग्णांची वाढ, तर ३५७ जणांचा मृत्यू

News Desk

महापालिकांना तसा सरसकट आदेश द्यावा, मनसेची सरकारकडे महत्त्वाची मागणी

News Desk