HW News Marathi
देश / विदेश

नागरिकांना ६ महिने पुरेल इतका अन्नसाठा देशात आहे

नवी दिल्ली | २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना केवळ जीवनावश्यक गोष्टी घेण्यासाठीच बाहेर पडता येणार आहे. आणि याच जीवनावश्यक गोष्टींचा साठा देशाकडे पुरेपुर असल्याची माहिती पीयुष गोयल यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. भारतीय खाद्य महामंडळाकडे ६ महिने पुरेल इतका खाद्यपदार्थांचा साठा आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लोकांना घाबरुन जाण्याचे कारण नाही आहे.

अन्न मंत्रालयानुसार भारतीय खाद्य महामंडळ (एफसीआय) ही देशातील धान्य साठवण्याची सर्वात महत्वाची सरकारी संस्था असून, ३१ मार्चला एफसीआयकडे ५.६७ कोटी मेट्रिक टन धान्यसाठा होता. यामध्ये ३ कोटी मेट्रिक टन तांदुळ तर २.६० कोटी मेट्रिक टन गहू आहे. एफसीआयने मोफत अन्न पुरवठा करण्याचीही तयारी केली आहे. दरम्यान, अन्नमंत्री रामविलास पासवान यांनीही ट्विट करत अन्नसाठा पुरेसा असल्याची माहिती दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वाह रे मोदी तेरा खेल”; इंधन दरवाढीविरोधात युवा काँग्रेस आक्रमक

News Desk

चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरही पाहिला नाही इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी लावला !

News Desk

प्लास्टिक अंड्यानंतर आता रसायनयुक्त अंडी आल्याने खळबळ

News Desk