HW News Marathi
देश / विदेश

पुलवामातील शहीदांचे स्मरण करण्याची ही पद्धत आहे का ?

नवी दिल्ली | सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान मंगळवारी (१९ फेब्रुवारी) रात्री दिल्लीत दाखल झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी बिन सलमान यांचे प्रोटोकॉल तोडून विमानतळावर स्वागत केले आहे. यावरून काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात आले आहे.”पाकिस्तानच्या तथाकथित दहशतवादविरोधी प्रयत्नांचे कौतुक करणाऱ्या व्यक्तीची गळाभेट घेऊन पंतप्रधान मोदी शहीदांचे स्मरण करत आहेत का ?”, असा बोचरा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे.

“पुलवामातील शहीदांचे स्मरण करण्याची ही पद्धत आहे का ? मोदीजी तुम्ही पाकिस्तान आणि सौदी अरेबियाच्या संयुक्त निवेदनात मसूद अजहरसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची भारताची मागणी जवळपास फेटाळून लावण्यात आली आहे. या संयुक्त निवेदनापासून सौदी अरेबियाला फारकत घ्यायला सांगाल का ?”, असे सवाल सुरजेवाला यांनी मोदींना विचारला आहे.

सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान मंगळवारी (१९ फेब्रुवारी) रात्री दिल्ली विमानतळावर दाखल झाले. मात्र, भारतात येण्यापूर्वी सलमान यांनी पाकिस्तानला भेट दिली. त्यावेळी सौदी अरेबिया आणि पाकिस्तानने दहशतवादविरोधी लढ्यासंदर्भात संयुक्त निवेदन दिले. या निवेदनात मसूद अजहरसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची भारताची मागणी जवळपास फेटाळून लावली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना बळ आणि तरुणांना नव्या संधी देणारा अर्थसंकल्प! – प्रितम मुंडे

Aprna

लष्कराची मोठी कारवाई; 8 दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

“भगवान राम, भगवान कृष्ण यांच्या सन्मानासाठी संसदेत कायदा पारित करा”, – अलाहाबाद न्यायालय

News Desk