HW News Marathi
देश / विदेश

पाकच्या ‘नापाक’ कारवाया सुरूच, शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन

श्रीनगर | भारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी आज (२६ फेब्रुवारी) पहाटे ३.३० च्या सुमारास जवळपास १००० किलो बॉम्ब टाकून एअर स्ट्राइक केली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानने आतापर्यंत अखनूर, नौशेरा आणि पुंछ सेक्टरमध्ये जोरदार गोळीबाराला सुरुवात केली आहे. भारतीय जवान देखील पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत.

भारताने नियंत्रण रेषेजवळच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला असून गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. पाकिस्तानचा अखनूर, नौशेरासह पुंछ आणि राजोरीतल्या मिळून जवळपास अशा काश्मीरच्या सात विविध सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे.

सेनेच्या या हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहरही ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा झाला आहे. २००० मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीवरून इंटरपोलने अजहर विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसने महाराष्ट्र सरकारला दिलेला पाठिंबा काढून टाकावा, आठवलेंचा सल्ला

News Desk

‘उत्तर प्रदेशात शीर कापून आणणाऱ्याला १ कोटींचे बक्षीस’

Gauri Tilekar

आसाममधील डबलडेकर पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन

News Desk