HW News Marathi
देश / विदेश

आता आपल्याला खऱ्या अर्थाने सावकारांचे नाव घेण्याचा अधिकार ! 

मुंबई । भारतीय वायू दलाने केलेल्या दमदार कारवाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वायु दलाचे अभिनंदन केले आहे.”भारतीय वायुदलाने ज्या पद्धतीने ही कारवाई केली आहे, त्यानंतर आता आपल्याला खऱ्या अर्थाने सावकारांचे यांचे नाव घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे”, असे भागवत यावेळी म्हणाले. भारतीय वायू दलाच्या ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये (एलओसी) असणाऱ्या दहशवाद्यांच्या तळावर मंगळवारी (२६ नोव्हेंबर) पहाटे ३.३० च्या सुमारास तब्बल १००० किलो बॉम्ब टाकले.

“भारतीय वायु दलाने देशातील जनतेच्या भावनांनुसार दहशतवादी तळ उद्धवस्त केले. या कारवाईदरम्यान त्यांनी कुठेही सामान्य नागरिकांची कोणत्याही प्रकारची हानी होऊ दिली नाही. भारतीय वायुसेनेची ही कारवाई भारतीय सभ्यतेनुसारच झाली आहे”, असे सरकार्यवाह भय्याजी जोशी म्हणाले. दरम्यान, अवघ्या २० मिनिटांमध्ये भारतीय सैन्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून देखील आता या कारवाईला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. या हवाई हल्ल्याने जैश-ए-मोहम्मदच्या ‘बालाकोट’ या दहशतवादी तळावर हा हल्ला करण्यात आला आहे. या कारवाईत जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर तसेच मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू काश्मीरमध्ये हिंसा केल्यास पाच वर्षांची शिक्षा

News Desk

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का- सिद्धूंचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा….

News Desk

रश्मी शुक्लांचा जबाब अखेर नोंदवला, मुंबई पोलिसांची टीम हैदराबादेतील निवासस्थानी पोहोचली

News Desk