HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक, हाय अलर्ट लागू

जम्मू- काश्मीर | जम्मू-काश्मीरमध्ये जवानांच्या एका पथकावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय लष्काराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या गोळीबारानंतर जम्मूमध्ये हाय अ‍ॅलर्ट लागू करण्यात आला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील महत्त्वांच्या आणि संवेदनशील भागातील सुरक्षा व्यवस्था आणखी चोख करण्यात आली आहे.

सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेल्या भागांमध्ये माता वैष्णव देवी देवस्थानकडे जाणार्‍या महामार्गाचाही समावेश आहे. जम्मू-श्रीनगर या राष्ट्रीय महामार्गावरील चौकशी नाक्यावर काल (बुधवारी) ट्रकमधून आलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करून दहशतवादी पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय लष्कराने तो ट्रक ताब्यात घेतला असून दशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी जवानांचे सर्च ऑपरेशन अद्यापही सुरूच आहे.

या वाहनांची तपासणी करताना एका ट्रकमध्ये १ एके प्रकारातील रायफल आणि ३ मॅगझिन्स सापडल्या आहेत. बारामुल्लाच्या सोपोरमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय जवानांना मिळाली होती. या जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हा’ निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते !

News Desk

नासाच्या कॅलेंडरसाठी भारतीय मुलांनी रेखाटलेल्या चित्रांची निवड

News Desk

मद्रास न्यायालयाने ‘टिकटॉक अ‍ॅप’वरील बंदी उठवली

News Desk