HW News Marathi
देश / विदेश

के. जी. बोपय्या यांच्या अध्यक्षतेखाली बहुमताची चाचणी

नवी दिल्ली | कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणी के. जी. बोपय्या यांच्या अध्यक्षतेखाली होईल, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. बोपय्या अध्यक्ष म्हणून मान्य नसेल तर आज होणारी बहुमत चाचणी रद्द करावी लागेल, यावेळी कोर्टाने असे म्हटले आहे. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष विरोधात याचिका करुन पेचात पडल्याचे चित्र दिसत होते. पण, बहुमत चाचणीचे लाइव्ह प्रक्षेपण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यामुळे काँग्रेस एका बाजूने समाधानी झाली आहे.

भाजपने ज्येष्ठता डावलून के. जी. बोपय्या यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष निवड करण्यात आली. या अध्यक्षला काँग्रेस-जेडीएसने यांनी या निर्णया विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी काँग्रेसची बाजू मांडली. बोपय्या यांची नियुक्ती अवैध असल्याचा दावा करत नियुक्त रद्द करण्याची मागणी केली होती. बोपय्या यांनी २००९ ते २०१३ या कालावधीत विधानसभा अध्यक्षपदही भूषवले आहे. प्रो टेम स्पीकर म्हणूनही यापूर्वी त्यांनी काम केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अन् खडसे फडणवीसांना म्हणाले, “आता जेवल्याशिवाय जाऊ नका…”

News Desk

विकास दुबे पोलीस चकमकीत ठार !

News Desk

राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी, कॉंग्रेसला सोडचिठ्ठी ?

News Desk
देश / विदेश

पाकिस्तानचे हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत

swarit

श्रीनगर | पाकिस्तानचे हेलिकॉप्टर भारताच्या हवाई सीमे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरने घिरट्या घालताना भारतीय लष्कराला दिसले आहे. सफेद रंगाचे हे हेलिकॉप्टर काही वेळ भारतीय सीमा भागात घिरट्या घालत होते.

पूंछ जिल्ह्यात रविवारी (३० सप्टेंबर)ला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाकचे हेलिकॉप्टर भारताच्या गुलपूर सेक्टरमध्ये भारतीय हवाई हद्दीत घुसले होते. भारतीय जवानांच्या लक्षात येताच त्यांनी हेलिकॉप्टरच्या दिशेने गोळीबारी करण्यास सुरुवात केली. लष्कराच्या प्रत्युत्तर दिल्यानंतर हेलिकॉप्टर पाकिस्तानात परतल्याची माहिती मिळाली आहे.

एका बाजुला पाकिस्तान म्हणते की, भारताने तिसऱ्यांदा पाकिस्तानसोतब भेट नकारली आहे. जर भारत-पाक भेट झाली असती तर दोन्ही देशामध्ये गेल्या ७० वर्षांपासून काश्मीरचा मुद्दा प्रलंबित आहे. आणि दहशतवादी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करता आली असती, असे शाह महमूद कुरैशी यांनी म्हटले. त्यामुळे भारताला शांततेसाठी बातचीत करण्याऐवजी अंतर्गत राजकारणाला महत्त्व देणे गरजेचे असल्याचे यावरून सिद्ध होत असल्याचे कुरैशी यांनी महासभेत सांगितले.

या महासभेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला दहशतवाद्याच्या मुद्यावरून खडेबोल सुनावले होते.‘पाकिस्तान हा असा शेजारी देश आहे, की ज्याने दहशतवाद पसरवण्याबरोबरच ते सत्य कशा प्रकारे नाकारण्याचे चांगले कसब त्यांना अवगत आहे येते.’ तसेच ‘पाकिस्तानमध्ये २६/११च्या हल्ल्याचा मास्टर माईंड उजळ माध्याने फिरत आहे’. अशा शब्दात स्वराज यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.

Related posts

पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरेंसाठी ‘नरेंद्रभाई’, राऊतांचं सूचक विधान

News Desk

भारतात मोमो चॅलेंजचा दुसरा बळी

Gauri Tilekar

‘मनसे’ची मतं आमच्याशी जुळली तर नक्कीच…! फडणवीसांनी दिले नवे संकेत

News Desk